

















कोल्हापूर: पुणे बेंगलोर एन एच 48 या महामार्गाचे सहा पदरी चे काम सातारा ते कोल्हापूर या दरम्यान काम सुरू आहे सध्या सातारा ते पेठ नाका यादरम्यानचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून वाहतूक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसत आहे परंतु पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान चे काम रखडले आहे या कामामुळे या महामार्गावरती छोटे-मोठे अपघात व जागोजागी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे याचा हा त्रास आम जनतेला व वाहन चालकांना होत आहे भारतीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर विभाग यांनी मार्च 26अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे एका माहिती अधिकारा मध्ये माहिती दिली आहे. तथापि या महामार्गावरती कागल, गोकुळ शिरगाव, उचगाव फाटा, तावडे हॉटेल, सांगली फाटा, पुलाची शिरोली नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी फाटा, शिये फाटा,
टोप, मंगरायाचीवाडी फाटा, अंबप फाटा, वॉटर उड्डाणपूल, किणी टोल नाका, तांदुळवाडी, येलूर फाटा, कामेरी ईश्वरपुर फाटा, वाघवाडी फाटा तसेच पेठनाका उड्डाणपूल या सर्व ठिकाणी अर्धवट कामे राहिली आहेत गेली तीन ते चार वर्षे झाली या महामार्गाचे सहा पदरीचे काम सुरू असून पेठ नाका ते कोगनोळी टोल नाका यादरम्यान सर्वच ठिकाणी अपूर्ण कामे तसेच पावसामुळे महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे तसेच अपघात ही होत आहेत कोल्हापूर हे जिल्ह्याचे केंद्रस्थान असल्याने या ठिकाणी कागल, गोकुळ शिरगाव शिरोली पुलाची या ठिकाणी एमआयडीसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महामार्गावरती ट्रान्सपोर्टच्या गाड्या व एमआयडीसी कामगार यांची मोठ्या प्रमाणात रहदारी होत आहे. वाहतूक दोन्ही बाजूने सर्विस रोडनेच सुरू असल्याने काही ठिकाणी अवजड वाहने ट्रान्सपोर्ट मध्ये गाडी भरणे करता जात असताना एकच मार्गाने जात आहेत त्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
गांधीनगर येथे कापड मार्केट मोठ्या प्रमाणात असल्याने कर्नाटक महाराष्ट्र व कोकण या विभागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात ,भाजीपाला फळे, कडधान्य व गुळाचे मार्केट मार्केटयार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो कोल्हापूर शहरामध्ये जग प्रसिद्ध अर्धशक्ती पीठ महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे श्रावण महिना व दसऱ्यामध्ये खूप खूप गर्दी असते लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात रंकाळा तलाव तलाव, किल्ले पन्हाळा गड येथे ही पर्यटक मोठ्या प्रमाणात रोज येत असतात,वाडी रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत केदारलिंग (ज्योतिबा) देवालयाची मंदिर असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात व पर्यटनासाठी पर्यटक सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज येत असतात अशा सर्व पर्यटकांना या महामार्गाच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे दिवशेनं दिवस वाहतूककोंडी ,रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रशासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष घालावे व या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.









#UPP4AmritMahotsav
प्रयागराज मंडल, उत्तर मध्य रेलवे द्वारा दिव्यांगजनों के लिए ATVM Facilitator के रूप में कार्य करने हेतु आवेदन आमंत्रित किए गए हैं।
📅 आवेदन की अंतिम तिथि: 07 सितम्बर 2026
आवेदन पत्र की जानकारी के लिए उत्तर मध्य रेलवे की www.ncr.indianrailways.gov.in वेबसाइट देखें।

पुणे: पुणे महानगरपालिका *”बालगंधर्व रंगमंदिर कार्यालय”* येथे 15 ऑगस्ट भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन हर्ष उल्हासाने ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली (एनजीओ),महाराष्ट्र राज्य,लातूर जिल्हा डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व बालगंधर्व रंगमंदिर कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने लातूर जिल्हा एनसीआईबी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी,पोलीस विभागाचे कर्मचारी,बालगंधर्व रंगमंदिर येथील अधिकारी सहकारी कर्मचारी,इतर मान्यवर उपस्थित होते.
लातूर:(प्रतिनिधी),१४ ऑगस्ट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली.शुक्रवार, १४ ऑगस्ट् रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग,बाभळगाव येथे गायिका सौ. वंदना कांबळे यांनी संतवाणी हा कार्यक्रम सादर केला.लातूरसह राज्यभरात यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग या विविध क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेले त्यांचे बहुमोल योगदान सदैव स्मरणात राहील. विकासाला गती देतानाच सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे विचार, कार्य आणि लोकसेवेची शिकवण कायम स्मरणात ठेवून त्यांनी घालून दिलेला लोकसेवेचा वसा पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीतून करण्यात येत आहे.
देशमुख कुटुंबीयांकडून पुष्पांजली
लोकनेते विलासरावजी देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई विलासरावजी देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजीत देशमुख, डॉ. सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पन करण्यासाठी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्ट्वाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त राहूल कुलकर्णी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहीनी नरहे विरोळ, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपआयुक्त पंजाबराव खानसुळे, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार, का. चेअरमन वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परीषद अध्यक्षा उषा पाटील, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय सांळुके, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव जवळगेकर, अॅड. किरण जाधव, लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय देशमुख या उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.मान्यवर, अधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आदरांजली कार्यक्रमात सभापती जगदीश बावणे, अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मण मोरे, अॅड. समद पटेल, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, अनंत देशमुख, संतोष देशमुख, अविनाश देशमुख, ललित भाई शहा, विजय देशमुख, कैलास पाटील, अनिल पाटील, गणपतराव बाजुळगे, अॅड. दिपक सुळ, अमर खानापूर, अॅड. दिपक राठोड, अमर राजपूत, गोविंद देशमुख, अॅड. फारुख शेख, डॉ. दिनेश नवगिरे, संभाजी सुळ, सुनील पडिले, डॉ. अजय जाधव, युवराज जाधव, संतोष सोमवंशी, गोविंद डुरे पाटील, कल्याण पाटील, शिवाजी कांबळे, विजय टाकेकर, बसवंतअप्पा बर्डे, सचिन पाटील, लालासाहेब चव्हाण, दिलीप पाटील नागराळकर, प्राचार्य बाबासाहेब गोरे, तबरेज तांबोळी, विकास वाघमारे, आशा भिसे, स्वयंप्रभा पाटील, विद्याताई पाटील, सपना किसवे, सई गोरे, शिलाताई पाटील,सोनाली थोरमोटे, कमलबाई मिटकरी, खाजाबानू बुऱ्हाण, सुनीता आरळीकर, संगीता मोळवने, संगीता पतंगे, सुलेखा कारेपूरकर, प्रितम जाधव, उषा राठोड, लता मुमाणे,मिनाताई सुर्यवंशी, सारिका फेरे, वर्षा मस्के, केशरबाई महापुरे, सौ. अनिता केंद्रे, रणजित पाटील, सूर्यकांत कातळे, गोटू यादव, पृथ्वीराज शिरसाठ, अविनाश बटटेवार, मुकेश बिदादा, बालाप्रसाद बिदादा, शरद देशमुख, जिते ंद्र देहाडे, अॅड. विजय गायकवाड, प्रा. प्रवीण कांबळे, शंकर बोळंगे, राम स्वामी, बादल शेख, अनंत बारबोले, राम को बडे, मारोती पांडे, बच्चेसाहेब देशमुख, अकबर कुरेशी,आनंदभाई वैरागे, संभाजी रेड्डी, असिफ बागवान, लक्ष्मीकांत मंठाळे, सुरेश गायकवाड, चांदपाशा इनामदार,प्रवीण सुर्यवंशी, डॉ. अरविंद भातांब्रे, अॅड. विकास सुळ, दगडूअप्पा मिटकरी, पप्पू देशमुख, गिरीश ब्याळे, रमेश थोरमोटे, नितीन कांबळे, अजित माने, रमेशसिंह बिसेन, अॅड. बाबा पठाण, पवनकुमार गायकवाड, राजा माने, मोहन माने, राजेसाहेब सवाई, मन्मथअप्पा कीडे, सिकंदर पटेल, गोरोबा लोखंडे, विनोद वीर पाटील, पद्माकर उगीले, गोविंद बोराडे, अॅड. सुनित खंडागळे, सचिन कांबळे, प्राचार्य साखरे, जितेंद्र सपाटे, आबासाहेब देशमुख, सुबुद्दीन शेख, अशोक अग्रवाल, राजकुमार जाधव, इसरार सगरे, हरीदास गडगडे, संकेत उटगे, पत्रकार-धर्मराज हल्लाळे, दिपरत्म निलंगेकर, प्रा. भालचंद्र येडवे, जयप्रकाश दगडे, चंद्रकांत झेंरीगुंठे, ओम मोतीपवळे, राम जेवरे, बशीर शेख, फिरोज पठाण, एजाज शेख, राजू पाटील, नेताजी जाधव, शिरीषकुमार शेरखाने, पंकज जैस्वाल, दत्तात्रय परळकर, संजय राजूळे, सुनील कोचेटा, व्यकंटेश पुरी, रवी पिंड, अजय बोराडे पाटील, काकासाहेब घुटे, श्रीशैल गडगडे, लि बराज पन्हाळकर, जावेद शेख, आनंद दणके, प्रकाश कुलकर्णी, सालार शेख, असीफ पटेल, विकी पवार, सुनील गुडे, प्रा.भारत सातपुते, हरी तुगावकर, डॉ. अभय कदम, नेताजी देशमुख, जयचंद भिसे, अॅड. महेश काळे, दिलीप माने, सचिन बंडापल्ले, सचिन दाताळ, पंडीत कावळे, हणमंत जगदाळे, शिवाजी देशमुख, सतीश हलवाई, प्राचार्य बालाजी वाकुरे,रमेश शिंदे, सचिन मस्के, सर्जेराव मोरे, शाम भोसले, प्रमोद जाधव, प्रदिपसी ह ग ंगणे, प्रशांत पाटील, एस.डी. बोखारे, राजपाल माने, बी. व्ही. मोतीपवळे, राजेश्वर देशमुख, कार्यकारी संचालक जितेद्र रनवरे, आबासाहेब पाटील, ए. आर. पवार, एच. जे. जाधव, लक्ष्मणराव देशमुख, रविद्र काळे, रमेश बियाणी,सतिश साळुंके, चक्रधर शेळके, विजयकुमार साबदे, इश्वरप्रसाद चांडक, अॅड. अतिश चिकटे, श्रीकृष्ण काळे, नितीन मोटेगावकर, सचिन मोटेगावकर,चंद्रकांत चिकटे, प्रा. संजय ओव्हाळ, युवराज थडकर,लालासाहेब देशमुख, डॉ. बालाजी सोळूके, मदन भिसे, चंद्रकांत साळूके, आदीनी आदरांजली वाहीली.
आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदीनानिमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्म संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासरावजी देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी यावेळी दाटून आल्या.या प्रसंगी आदरांजली सभेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने गायिका सौ.वंदना कांबळे यांनी ‘संतवाणी’ आणि भक्तिसंगीत माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.


