Krishnat Mali

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या; अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन छेडणार! महाराष्ट्र मंदिर महासंघ


कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणारा आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून, तो हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवर बेट घाला घालणारा आहे. या देवस्थान मालकरहक्क विरोधी मसुद्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून तो सरकारने विनाशर्त मागे घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. या प्रसंगी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अशोक गुरव, राधाकृष्णाचे मंदिराचे विश्वस्त श्री. हसमुखभाई शहा, लक्ष्मीनारायण मंदिराचे विश्वस्त श्री. राजेंद्र शर्मा, श्री. संजय देवणे रामानंद संप्रदाय जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी उपस्थित होते.

या प्रसंगी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधीसाठी, मंदिरांचे संवर्धन, अन्नछत्रांसाठी आणि रुढी-परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत. सार्वजनिक ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये कायद्यानुसार देवस्थानची ‘मूर्ती’ ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ (Juristic Person) मानली जाते आणि या जमिनींची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र, प्रस्तावित कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार, ही सर्व इनामे एका झटक्यात रद्द करून, त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे ‘मालक’ म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पिढ्यानपिळ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणा-या जमिनींचे व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरे परावलंबी होतील, अशी भीती निर्माण झाली आहे.”

या कायद्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कलम १ उपकलम २ अन्वये, वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील जमिनींना या कायद्यातून वगळण्यात आले आहे. केवळ हिंदू देवस्थानांच्या जमिनींचे ‘निर्मूलन’ करणे आणि इतर धर्माच्या संस्थांना संरक्षण देणे, हा प्रकार शासनाच्या निधर्मी धोरणाशी विसंगत असून संविधानाच्या अनुच्छेद १४ मधील ‘समानतेच्या अधिकाराचे’ उल्लंघन करणारा आहे. एकीकडे वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण दिले जात असताना, दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी कायदा करणे, हा दुजाभाव निषेधार्ह आहे.

तसेच, कलम १८ नुसार या कायद्यांतर्गत महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. हा भाविकांच्या आणि विश्वस्तांच्या घटनात्मक अधिकारांवर मोठा प्रहार आहे. न्यायालयाचे दरवाजे बंद करून सरकार प्रशासकीय दडपशाही लादू पाहत आहे, असे स्पष्टपणे दिसून येते. अतिक्रमणे काढण्याऐवजी , १ जानेवारी २०११ पूर्वीपासून ताबा असलेल्या अतिक्रमणधारकांनाच त्या जमिनींची मालकी बहाल करणे, हा प्रकार म्हणजे देवस्थानच्या मालमत्तेची एक प्रकारे कायदेशीर लूटच आहे.

शासनाने या मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत अपुरी असून, ती किमान दोन महिन्यांनी वाढवून मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. महाराष्ट्रातील मंदिरांचे वैभव आणि वारसा टिकवण्यासाठी सरकारने वा मसुद्याचा पुनर्विचार करावा. जर सरकारने हा हिंदूविरोधी कायदा रेटण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. शासनाने गुजरातच्या धर्तीवर ‘अँटी लैंड ग्रंबिंग अॅक्ट’ लागू करून देवस्थान जमिनींना संरक्षण द्यावे आणि ७/१२ उताऱ्यावर ‘देवस्थान जमीन प्रतिबंधित सत्ता प्रकार’ अशी नोंद करावी, जेणेकरून या जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवता येईल. अशी माहिती श्री. प्रसाद कुलकर्णी, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, कोल्हापूर जिल्हा यांनी दिली

संवेदनशील समाजच बालकांचे खरे संरक्षण करू शकतो! अतुल देसाई – सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग


कोल्हापूर: नसरापूर प्रकरणातील अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर क्रूरपणे करण्यात आलेली हत्या ही अत्यंत वेदनादायक, संतापजनक आणि समाजमन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज अल्पवयीन बालकांवरील हिंसक आणि लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांकडे केवळ पोलीस यंत्रणा, न्यायालयीन विलंब किंवा कायद्यांच्या चौकटीतून पाहणे पुरेसे ठरणार नाही. निश्चितच कठोर कायदे, वेगवान तपास आणि जलद न्यायव्यवस्था आवश्यक आहेत; परंतु समाजात वाढत चाललेल्या विकृत मानसिकतेविरुद्ध सामाजिक जागरूकता आणि सामूहिक संवेदनशीलता निर्माण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
अशा घटना रोखण्यासाठी नेमके काय करावे? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील नागरिकासमोर उभा आहे. एकीकडे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, न्यायालयीन प्रक्रियेला गती आणि तपासात आधुनिक तंत्रज्ञानासह फॉरेन्सिक सायन्सचा व्यापक वापर आवश्यक आहे. तर दुसरीकडे समाज म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपली मुलेच नव्हे, तर शेजारची, नात्यातील, गावातील प्रत्येक मुल सुरक्षित राहावे ही सामूहिक भावना समाजात रुजली पाहिजे. अनेक घटनांमध्ये असे दिसून आले आहे की, पालक कामानिमित्त बाहेर असताना एकटी असलेली मुले लक्ष्य बनतात. अधिक चिंताजनक बाब म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा परिचित, नातेवाईक, शेजारी किंवा विश्वासातील व्यक्तींचाच सहभाग आढळतो. त्यामुळे बालकांना लहानपणापासून स्वसंरक्षणाची कौशल्ये, चांगला-स्पर्श आणि वाईट-स्पर्श याची जाणीव तसेच धोक्याच्या प्रसंगी मदत मागण्याचे धैर्य आणि कृती याची माहिती देणे काळाची गरज बनली आहे. यासाठी पालक आणि मुलांमधील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या भावना आणि मतांना आदर देणे, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात तसेच बालक पालक नात्यात विश्वास निर्माण करतात. उपदेशात्मक किंवा आदेशात्मक पालकत्वाऐवजी संवादात्मक आणि संवेदनशील पालकत्व स्वीकारणे आवश्यक आहे. कारण एखादी अनुचित घटना घडल्यानंतर अनेक मुले बोलण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांच्यावर अविश्वास दाखवणे, त्यांनाच दोष देणे किंवा गप्प बसवणे ही अधिक धोकादायक बाब ठरू शकते.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानेही या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुलांशी संबंधित घटनांची तातडीने आणि संवेदनशीलतेने हाताळणी व्हावी यासाठी ‘विशेष बाल पोलीस पथक’ कार्यरत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी युनिसेफ आणि यशदा यांच्या सहकार्याने ‘बालस्नेही पंचायत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि भावनिक सुरक्षितता यासाठी ‘मानस’ या प्रकल्पावर आयोग काम करत आहे. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्य करणाऱ्या निवासी संस्थांमधील मुलांसाठीही विशेष मॉड्यूल विकसित करून त्यावर काम सुरू करण्यात येणार आहे.
एकूणच, बालकांवरील वाढत्या हिंसाचाराचा विचार करता ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची लढाई नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. प्रशासन, न्यायव्यवस्था, शैक्षणिक संस्था, पालक आणि सजग नागरिक अशा सर्वांनी मिळून सुरक्षित, बालस्नेही आणि बाल हक्कांनी समृद्ध समाज उभारण्याचा संकल्प केला तरच अशा दुर्दैवी घटनांना आळा बसू शकेल. प्रत्येक बालक सुरक्षित असेल, तरच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि प्रगत म्हणवला जाईल. अशी माहिती
अतुल देसाई सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग
यांनी दिली.

अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविणे करीता देणारे एकूण १५ मुलांचे पालक / वाहनाचे मालक यांचे विरुध्द पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करुन वाहतूक शाखेकरवी विशेष कारवाईची मोहीम


कोल्हापूर शहर : उपनगरामध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाचे अल्पवयीन मुलांनी दुचाकी वाहन चालवलेमुळे गंभीर अपघात सारख्या घटना घडलेल्या आहेत. अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविणेस देणारे त्या मुलांचे पालक व वाहन मालक हे सुज्ञ असून अल्पवयीन मुलास कायदयाचे ज्ञान नाही, तो अज्ञान आहे, त्यास दुचाकी वाहन चालविणेस दिलेस तो इतर वाहन धारकांना धोका निर्माण करु शकतो अगर स्वतः चे नुकसानीस कारणीभुत होवु शकतो हे माहीत असतानाही काही पालक स्वतःचे मुलाचे सुरक्षिततेचा विचार न करता अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस देत असतात. त्यामुळे अशा प्रकारे दुचाकी वाहन चालविणेस देणारे पालक/मालक यांचेवर वाहतुक शाखेमार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तसेच विविध शाळांना भेटी देवुन वाहतुक नियमांबाबत विदयार्थ्यांना प्रबोधन केले जात आहे.

तरी परंतू कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुले / मुली यांचेमध्ये दुचाकी चालविण्याचे प्रमाणात वाढ झालेली असून या प्रवृत्तीस आळा बसावा या करीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल यांनी दिले सुचनेनुसार, मा. अपर पोलीस अधीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे मार्गदर्शना नुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचे वतीने अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन चालविण्यास पालकांचे विरुध्द मोटर वाहन (सुधारणा) अधिनियम सन २०१९ मधील कलम १९९ (अ) नुसार शाहुपूरी -०८, राजारामपूरी ०३, जुनाराजवाडा-०१, व लक्ष्मीपुरी-०३ असे एकुण १५ गुन्हे शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन सदर गुन्हयात वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शकते. अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस दिलेस खालील प्रमाणे कायदेशीर कारवाई होवू

१. पालक/मालक यांना ३ वर्षापर्यंत तुरुंगवास होवू शकतो त्यासोबत २५०००/- रुपयाचा दंड भरावा लागतो.

२. ज्या वाहनाचा वापर अल्पवयीन मुलाने केला आहे त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (आरसी) १२ महिन्यासाठी रद्द केले जाते.

३. संबंधीत मुलांवर बाल न्याय कायदया अंतर्गत खटला चालविला जातो.

४. अल्पवयीन मुलास वयाची २५ वर्षे पुर्ण होईतो पर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणेस अपात्र ठरतो.
5. -२-

तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास देवू नये. अल्पवयीन मुलास वाहन चालविणेस देवुन नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे, तरी नागरीकांनी/वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी,

सदरची कारवाई शहर वाहतुक शाखेकडील पोनि मोरे यांचे निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रणेतून 200 हुन अधिक मरणोत्तर देहदान

कोल्हापूर:जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रणेतून 2016 पासून देहदान ,अवयव दान हा उपक्रम समाजाच्या सेवेसाठी देशभरात अहोरात्र सुरू आहे या उपक्रमामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे याचबरोबर अववयव दानामुळे बऱ्याच गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संदेशाचे समाजामध्ये कौतुक होत आहे
आत्तापर्यंत 200 देहदान 156 अवयवदान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम रत्नागिरी यांच्या वतीने विविध राज्यात व जिल्ह्यात होत आहे ज.न.म संस्थानाकडून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. याचाच एक भाग कै. विवेकानंद बाळकृष्ण रावळ मु.पो. कोल्हापूर नाका स्वामी मळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर वय वर्षे ६४ यांचे वृद्धाप काळाने बुधवार दिनांक १५/४/२०२६ रोजी मृत्यू झाला त्यांनी मृत्यू पश्चात देहदान करण्याचा संकल्प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम रत्नागिरी यांच्याकडे देहदान करण्यासंदर्भात फॉर्म भरून दिला होता त्या अनुषंगाने त्यांची मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा होती त्यांची मुले श्री सुनील रावळ व अनिल रावळ यांनी ज.न.म. संस्थान नाणिजधाम यांच्याशी संपर्क साधून आपल्या वडिलांची मरणोत्तर देहदानाच्या इच्छापूर्तीसाठी कळवले संस्थानाने तात्काळ दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा रामानंद संप्रदाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून सदरचे 198 मरणोत्तर देहदान हे राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडे केले यावेळी डॉक्टर. सौ.संध्याराणी पाटील प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचना शास्त्र व त्यांचा स्टाफ तसेच मरणोत्तर देहदान दात्यांच्या वतीने नातेवाईक बाळकृष्ण आप्पाजी रावळ — वडील श्रीमती विमल विवेकानंद रावळ– पत्नी सुनील रावळ मोठा मुलगा अनिल रावळ — लहान मुलगा ,स्नेहल सुनील रावळ — मोठी सुनशोभा रावळ–मुलगी हणमंत रावळ — जावई नातवंडे ज्ञानेश्वरी रावळ रुद्र रावळ पूजा रावळ श्रीकांत रावळ श्रीहरी रावळ सहर्ष रावळ अरुण रावळ– भाऊ कल्पना रावळ — भावज
तसेच रामानंद सांप्रदाय कोल्हापूर जिल्हा कार्यकर्ते जिल्हा सेवा अध्यक्ष श्री कृष्णात माळी,जिल्हा सह अध्यक्ष श्री मधुकर बाबर,जिल्हा सचिव श्री दिलीप कोळी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री रमेश मगदूम,जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री अमित लाड,मुख्यपीठ महिला निरीक्षक सौ राधिका पाटील,गोवा उपपीठ महिला सपोर्टर सौ सीमा पाटील,मुख्यपिठ जनगणना प्रमुख श्री तुषार कदम, श्री अप्पासो कोणे,करवीर तालुका अध्यक्ष सौ अंजली तळवणेकर,श्री अमोल तळवणेकर,माजी जिल्हा युवा अध्यक्ष श्री अमोल पाटील,सौ लीना मोरस्कर, श्री विलास मोरस्कर,सौ आरती लाड, प्रोटोकॉल अधिकारी श्री एम आर पाटील, प्रोटोकॉल अधिकारी श्री विजय धनवडे,हातकणंगले माजी तालुका आध्यक्ष श्री सागर चव्हाण,श्री राम बन्ने,श्री विलास साळोखे,हातकणंगले तालुका ब्लड इन नीड प्रमुख श्री गुरुप्रसाद माळी,हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश लोहार, सौ शीतल पाटील, गणेश कोळी,तसेच भक्त शिष्य उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत तीन मरणोत्तर देहदान व अवयव दान झाल्याची माहिती व ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी यांनी दिले.

रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दि. १२ एप्रिल रोजी पादुका दर्शन सोहळा प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन

कोल्हापूर : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा पादुका दर्शन सोहळा रामकृष्ण लॉन आणि हॉल, मार्केट यार्ड, मेनन अँड मेनन कंपनी जवळ,कोल्हापूर ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे रविवार दि.१२एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ पासून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका व प्रतिमा पूजनाने रिव्हरसाईड होंडा शोरूम, मार्केट यार्ड पासून मिरवणुकीस सुरवात होणार आहे.सकाळी १० वा सिद्ध पादुकांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर प.पू.कानिफनाथ महाराज यांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर ज.न.म.संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत गरीब,गरजू व होतकरू शालेय विध्यार्थ्यांना मोफत १०१ सायकलींचे विविध मान्यवारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुपूजन संपन्न होणार आहे. त्यानंतर आरती सोहळा, ज.न.म.प्रवचनकार यांचे प्रवचन होणार आहे तसेच प.पू.कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होणार आहे. त्यानंतर रामानंद संप्रदायामध्ये नवीन समाविष्ट होणाऱ्या भाविकांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांना सिद्ध पादुकांचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी केली आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी होऊन सदर कार्यक्रमाची सांगता होणार असलेची माहिती जिल्हा निरीक्षक दिपक खरुडे व जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश मगदूम यांनी दिली. यावेळी मुख्य पीठ महिला निरीक्षका सौ राधिका पाटील, उत्सव कमिटी अध्यक्ष एम आर पाटील, मधुकर बाबर, दिलीप कोळी,तुकाराम पाटील,सौ.सीमा पाटील,सौ.नीता सुतार,सौ.प्रणाली पाटील, अंजली तळवणेकर,अमित लाड, अमोल पाटील,विजय पाटील, महेश पाटील, तुषार कदम, श्री.दशरथ मोहिते, आकाश साळोखे, उत्तम माळवी, पूजा चव्हाण विजय धनवडे सुभाष सुतार, विवेक सुतार ,आप्पासो कोणे मंगल चव्हाण, तिलोत्तमा नाईक, उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करणेसाठी आजी माजी पदाधिकारी सर्व तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटी प्रयत्न करीत आहेत.

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.

या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ­ढोल पथक ­ कलशधारी महिला­ श्रीराम पंचायतन ­ घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक ­ मर्दानी खेळ – भजन मंडळ ­ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे, पुजा चव्हाण, मनीषा मगदूम, शोभा धनवडे ,कृष्णात पाटील, यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४ वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ­ढोल पथक ­ कलशधारी महिला­ श्रीराम पंचायतन ­ घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक ­ मर्दानी खेळ – भजन मंडळ ­ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे पुजा चव्हाण शोभा धनवडे कृष्णात पाटील यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुड भरारी 16 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना : आमदार जयंतराव पाटील


ईश्वरपूर: सोमनाथ ना.पत संस्था मर्या पेठवडगाव या संस्थेच्या ईश्वरपूर येथे सोळाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला
यावेळी बोलताना जयंतराव पाटील म्हणाले सोमनाथ पतसंस्थेने अल्पावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढ करून शासनाचे निकषाचे पालन करून ईश्वरपूर येथे १६ व्या शाखेचा शुभारंभ आज माझ्या हस्ते संपन्न होत आहे एक आनंदाची गोष्ट आहे या संस्थेचा प्रत्येक वर्षीचा चढता आलेख पाहता या संस्थेचे कोल्हापूर सांगली व पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा विस्तार होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व ईश्वरपूर येथील सर्व ग्राहक,ठेवीदार सभासद तसेच हितचिंतक यांना आपले व्यवहार सोमनाथ पतसंस्थेत करण्याबाबतचे अवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र डॉक्टर आमदार अशोकराव माने उपस्थित होते यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या
संस्थापक अध्यक्ष अशोक माळी यांनी बोलताना संस्थेने अल्पावधीत 38 कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असलेचे सांगून संस्थेचा महाराष्ट्र भर विस्तार करणार असले बाबत संस्थेने विविध कर्ज योजना राबवत असल्याचे माहिती दिली तसेच संस्थेच्या सर्व शाखेमध्ये आरटीजीएस एनईएफटी सुविधा सुरू असून सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली मध्ये सुरू असल्याची माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. अतुल पाटील, हणमंत माळी,संचालक राजाराम बापू सह साखर कारखाना संचालक नगरसेवक आनंदराव पवार हिंदुराव माळी, तसेच शहाजी बापू पाटील संस्थापिका सौ.रूपाली माळी,व्हा.चेअरमन बजरंग माळी, संचालक हंबीरराव देसावळे , संपतराव पाटील , संजय धोंगडे ,चंद्रकांत माळी, जनरल मॅनेजर कृष्णात माळी असि.ज. मॅनेजर नागनाथ माळी, शाखा चेअरमन महेश माळी व्हा चेअरमन विष्णू माळी सदस्य शिव प्रसाद माळी, जयकर नागरे पाटील, जयंत पाटील, श्रीरंग माळी, बाबासाहेब हावलदार, रमेश माळी, दिग्विजय माळी, प्रकाश कोकितकर, अरुण माळी, शाखाधिकारी विक्रांत माळी ,उमेश पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. एम.बी.किडगावकर शाखा वडणगे चेअरमन सुभाष पाटील सदस्य सयाजी घोरपडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ माळी यांनी केले आभार शाखा चेअरमन महेश माळी यांनी मानले

लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन

https://www.youtube.com/live/q0M6HVPSRhc?si=BDTRoNV8KM9GRMU2