Krishnat Mali

रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दि. १२ एप्रिल रोजी पादुका दर्शन सोहळा प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन

कोल्हापूर : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा पादुका दर्शन सोहळा रामकृष्ण लॉन आणि हॉल, मार्केट यार्ड, मेनन अँड मेनन कंपनी जवळ,कोल्हापूर ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे रविवार दि.१२एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ पासून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका व प्रतिमा पूजनाने रिव्हरसाईड होंडा शोरूम, मार्केट यार्ड पासून मिरवणुकीस सुरवात होणार आहे.सकाळी १० वा सिद्ध पादुकांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर प.पू.कानिफनाथ महाराज यांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. त्यानंतर ज.न.म.संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत गरीब,गरजू व होतकरू शालेय विध्यार्थ्यांना मोफत १०१ सायकलींचे विविध मान्यवारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुपूजन संपन्न होणार आहे. त्यानंतर आरती सोहळा, ज.न.म.प्रवचनकार यांचे प्रवचन होणार आहे तसेच प.पू.कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होणार आहे. त्यानंतर रामानंद संप्रदायामध्ये नवीन समाविष्ट होणाऱ्या भाविकांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांना सिद्ध पादुकांचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी केली आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी होऊन सदर कार्यक्रमाची सांगता होणार असलेची माहिती जिल्हा निरीक्षक दिपक खरुडे व जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश मगदूम यांनी दिली. यावेळी मुख्य पीठ महिला निरीक्षका सौ राधिका पाटील, उत्सव कमिटी अध्यक्ष एम आर पाटील, मधुकर बाबर, दिलीप कोळी,तुकाराम पाटील,सौ.सीमा पाटील,सौ.नीता सुतार,सौ.प्रणाली पाटील, अंजली तळवणेकर,अमित लाड, अमोल पाटील,विजय पाटील, महेश पाटील, तुषार कदम, श्री.दशरथ मोहिते, आकाश साळोखे, उत्तम माळवी, पूजा चव्हाण विजय धनवडे सुभाष सुतार, विवेक सुतार ,आप्पासो कोणे मंगल चव्हाण, तिलोत्तमा नाईक, उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करणेसाठी आजी माजी पदाधिकारी सर्व तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटी प्रयत्न करीत आहेत.

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.

या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ­ढोल पथक ­ कलशधारी महिला­ श्रीराम पंचायतन ­ घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक ­ मर्दानी खेळ – भजन मंडळ ­ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे, पुजा चव्हाण, मनीषा मगदूम, शोभा धनवडे ,कृष्णात पाटील, यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली

कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४ वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ­ढोल पथक ­ कलशधारी महिला­ श्रीराम पंचायतन ­ घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक ­ मर्दानी खेळ – भजन मंडळ ­ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे पुजा चव्हाण शोभा धनवडे कृष्णात पाटील यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोमनाथ पतसंस्थेची अल्पावधीत गरुड भरारी 16 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना : आमदार जयंतराव पाटील


ईश्वरपूर: सोमनाथ ना.पत संस्था मर्या पेठवडगाव या संस्थेच्या ईश्वरपूर येथे सोळाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला
यावेळी बोलताना जयंतराव पाटील म्हणाले सोमनाथ पतसंस्थेने अल्पावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढ करून शासनाचे निकषाचे पालन करून ईश्वरपूर येथे १६ व्या शाखेचा शुभारंभ आज माझ्या हस्ते संपन्न होत आहे एक आनंदाची गोष्ट आहे या संस्थेचा प्रत्येक वर्षीचा चढता आलेख पाहता या संस्थेचे कोल्हापूर सांगली व पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा विस्तार होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व ईश्वरपूर येथील सर्व ग्राहक,ठेवीदार सभासद तसेच हितचिंतक यांना आपले व्यवहार सोमनाथ पतसंस्थेत करण्याबाबतचे अवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र डॉक्टर आमदार अशोकराव माने उपस्थित होते यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या
संस्थापक अध्यक्ष अशोक माळी यांनी बोलताना संस्थेने अल्पावधीत 38 कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असलेचे सांगून संस्थेचा महाराष्ट्र भर विस्तार करणार असले बाबत संस्थेने विविध कर्ज योजना राबवत असल्याचे माहिती दिली तसेच संस्थेच्या सर्व शाखेमध्ये आरटीजीएस एनईएफटी सुविधा सुरू असून सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली मध्ये सुरू असल्याची माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. अतुल पाटील, हणमंत माळी,संचालक राजाराम बापू सह साखर कारखाना संचालक नगरसेवक आनंदराव पवार हिंदुराव माळी, तसेच शहाजी बापू पाटील संस्थापिका सौ.रूपाली माळी,व्हा.चेअरमन बजरंग माळी, संचालक हंबीरराव देसावळे , संपतराव पाटील , संजय धोंगडे ,चंद्रकांत माळी, जनरल मॅनेजर कृष्णात माळी असि.ज. मॅनेजर नागनाथ माळी, शाखा चेअरमन महेश माळी व्हा चेअरमन विष्णू माळी सदस्य शिव प्रसाद माळी, जयकर नागरे पाटील, जयंत पाटील, श्रीरंग माळी, बाबासाहेब हावलदार, रमेश माळी, दिग्विजय माळी, प्रकाश कोकितकर, अरुण माळी, शाखाधिकारी विक्रांत माळी ,उमेश पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. एम.बी.किडगावकर शाखा वडणगे चेअरमन सुभाष पाटील सदस्य सयाजी घोरपडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ माळी यांनी केले आभार शाखा चेअरमन महेश माळी यांनी मानले

लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन

https://www.youtube.com/live/q0M6HVPSRhc?si=BDTRoNV8KM9GRMU2

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सरोळी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न १० हजार हून भाविकांची उपस्थिती _____ स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप

कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवारी १० डिसेंबर रोजी सरोळी ता आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रम वाटप सोहळा संपन्न झाला
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थाना पासुन पादुकाची भव्यदिव्य रथातून शोभायात्रा निघाली यामध्ये निशान धारीपुरुष- महिला कलशधारी महिला, भजन व महिलांचे लेझीम पथक हलगी वाद्य व तुतारी च्या गजरात ही शोभायाता गावातील प्रमुख मार्गावरुन जात ती १०.३० वाजता विविध पथक व ढोल ताशाच्या निनादात कार्यक्रम स्थळी पोचली ११ वाजता पुरोहितांच्या वतीने यजमा द्वारे गुरुपूजन सोहळा संपन्न झाला गुरुपूजना साठी हजारो भाविकांच्या गुरु पूजनाची व्यवस्था जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते १२.३० वाजता आरती संपन्न झाली.

त्या नंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटी चे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.


यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय उप पोलीस अधिक्षक गडहिंग्लज विभाग रामदास इंगवले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक श्री जनार्दन नेऊगरे करवीर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरुडे मुख्य पीठ युवा निरीक्षक सुनील वीर ,पीठ लेफ्टन जनरल राजेंद्र खांबल, पीठ महिला निरीक्षक राधिका पाटील, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम पादुका दर्शन दौरा प्रमुख सोमदे आप्पा ,ज.न.म. संस्थांनचे ट्रस्टी अभिजीत अवसरे , प्रोटोकॉल अधिकारी विक्रांत घासे व त्यांची टीम यांच्यासह इतर मान्यवर वआयोध्या उत्तर प्रदेश व हम्पी या धारवाड ठिकाणाहून आलेले साधुसंत उपस्थित होते


यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिक्षक रामदास इंगवले म्हणाले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे समाजकार्य व अध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे मला माहित नव्हतं की पेपरच्या माध्यमातून ऐकलं होतं परंतु आज संस्थानाच्या ईव्ही च्या माध्यमातून जगद्गुरु च्या कार्याची माहिती घेतल्यानंतर समजले की किती मोठे आध्यात्मिक व सामाजिक कार्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे आहे आज सरोळी येथे आम्हा सर्वांच्या हस्ते १६ घरघंटींचे गरजू महिलांना वाटप केले जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणून जगद्गुरूंच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या


त्यानंतर उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना तरुणांना रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे असे आवाहन केले व जिल्हा सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तगण यांना शुभाशीर्वाद दिले त्यानंतर ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट झालेल्या भक्तगणांना ४६८ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ऑनलाइन उपासक दीक्षा बाबत मार्गदर्शन व उपासक दीक्षा दिली.
त्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य चार्यजी त्यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सुरू झाला सर्वांना महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक भक्तगण उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा सहध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील जिल्हा पदाधिकारी अमोल पाटील, महेश पाटील , रुपेश सुतार , आकाश साळुंखे, उत्तम माळवी, विवेक सुतार ,तुकाराम पाटील ,पूजा चव्हाण ,जिल्हा माजी पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील, सहनिरीक्षक रमेश लोकरे प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील, विजय धनवडे, सुभाष सुतार यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समिती आजी माझी पदाधिकारी सर्व दानशुर दाते जिल्ह्याचे ज.न.म प्रवचनकार सर्व तालुका सेवा समिती महिला सेना, युवासेना, संग्राम सेना
विषेश सहकार्य जिल्ह्य सहअध्यक्ष मधुकर बाबर आजरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आकाराम देसाई बजरंग पाटील शिवाजी सरंबळे, विठ्ठल जाधव व आजरा तालुका व सेवा केंद्र पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी दोन महिने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहिते यांनी केले आभार सामाजिक उपक्रम प्रमुख अमित लाड यानी मानले.

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम _____ स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मोफत वाटप कार्यक्रमाची जय्यत तयारी

कोल्हापूर:जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील श्री आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत स्वागत पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रे मध्ये विविध पथक असणार आहेत ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी प्रस्थान होणार आहे त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी१६ घरघंटी चे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
त्यानंतर मान्यवरांचे मनोगत संपन्न होणार आहे त्यानंतर पादुका व गुरुपूजन सोहळा आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे . त्यानंतर पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार या कार्यक्रमात उपस्थिती राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा.असे आव्हान रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत तसेच सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती
व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे..

रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे कोल्हापूर शहरात भव्य स्वागत

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात आज रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे करवीर तालुक्याच्या वतीने जल्लोषात स्वागत दिनांक २७ सप्टेंबर २०२५, तेलंगणा येथील श्रीक्षेत्र उपपीठ तेलंगणा, कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे वसलेल्या जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय, तेलंगणा उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेले आहे. या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक तेलंगणा पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ५९ वा वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी हि दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.


तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई उपपीठ (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व गोवा या ७ उपपिठाहून देखील अश्याच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत. या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे.
या दिंडीतून, सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो लोकांची खाण्या पिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे. मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन २ स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दरदिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे.


विशेष म्हणजे हि दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे. त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगती मध्येच आहेत. एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात हि दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली. अश्याप्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन २ दिंडींसह, जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे. यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीहि दिसून येते.
या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले, कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे, सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक ऍम्ब्युलन्स चालताना आढळून आली. ज्यात एक वैद्यकीय पथकहि सेवा देताना दिसून आले आहे. अशी हि आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही तर युवा-युवती, महिला-पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले.


जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, जसे महामार्गावरील ऍम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, गरीब मुलांसाठी मोफत CBSE बोर्डचे शिक्षण, सर्व जातीपंथांच्या मुला-मुलींसाठी मोफत वेदपाठशाळा, रक्तदान, व्यसनमुक्ती, आपत्कालीन सेवा, दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अश्या अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखले गेला आहे. त्यांच्या या विविध समाजहितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवर यांचे कौतुक होत आहे.

यासोबत दुग्धशर्करा योग म्हणजे हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना ‘एक पेड माँ के नाम’, जी या सलग ३ वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरणसंरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते. म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हिरीरीने आणि सक्रिय सहभाग घेतला आहे. या दिंडींदरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे उत्साहात स्वागत

कोल्हापूर: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ तेलंगणा ते नाणिजधाम रत्नागिरी (महाराष्ट्र) या वसुंधरा पायी दिंडीचे कोल्हापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व शिरोळ तालुका सेवा समिती यांच्या वतीने जयसिंगपूर येथे हलगीच्या गजरात अश्वाच्या नाचात उत्साहात स्वागत करण्यात आले अतिशय मनमोहक सुंदर सजावट केलेल्या रथामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका पूजन शिरोळ तालुक्यातील यजमानांच्या हस्ते संपन्न करण्यात आले तसेच सुहासिनीनी पादुकांचे औक्षण करून वातावरण मंगलमय केले तसेच शुभारंभ मल्टीपर्पज हॉल जयसिंगपूर येथे पादुकांचे मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले यावेळी यजमानांच्या हस्ते पूजन करून स्वागत केले.

ही वसुंधरा पायी दिंडी रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा पिठावरून दि 27 सप्टेंबर 2025 रोजी निघाली असून या वसुंधरा दिंडीमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणासाठी ही वसुंधरा पायी दिंडी चे आयोजन केले असून यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी हजारो किलोमीटर पायी प्रवास करून 21 ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत ही दिंडी ग्लोबल वार्मिंग चे धोके काय आहेत पर्यावरणाचा समतोल कसा राखावा निसर्गाचे रक्षण कसे करावे पृथ्वीचे रक्षण कसे करावे प्लॅस्टिक वापर करू नये झाडे लावा झाडे जगवा झाडे तोडू नका प्रदूषण टाळा नदी नाले स्वच्छ ठेवा परिसरात स्वच्छता राखा अशी संदेश देणारे फलक घेऊन चालणारे युवायुवती जनजागृती करत आहेत त्याचप्रमाणे युवा युवती ग्लोबल वॉर्मिंगचे पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत या दिंडीतील हजारो अनुयायी दररोज 25 किलोमीटर पायी प्रवास करत जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत कोल्हापूर जिल्ह्यातून हातकणंगले करवीर कोल्हापूर शहरातून तसेच पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यातून नाणिजधाम च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या दिंडीमध्ये पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून दिंडी मुक्काम व दुपारची भोजन या मार्गावरती एक पेड माँ के नाम या अनुषंगाने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वृक्ष लागवड ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम फक्त संदेशापुरता मर्यादित न राहता कृतीतही उत्तरविला जात आहे या संपूर्ण यात्रेची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि अध्यात्मिक वातावरणात केली गेली आहे यात्रिकेसाठी सात्विक पौष्टिक आणि शुद्ध अन्नाची विशेष भोजन व्यवस्था केली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी टॉयलेट व्हॅन आरोग्य पथक औषधे रुग्णवाहिका याची व्यवस्था केली आहे प्रत्येक मुक्कामी निवास आणि विश्रांतीची सोय केली आहे या दिंडीमध्ये प्लास्टिकचा पूर्णतः निषेध करण्यात आला आहे प्रत्येक यात्रेकी स्वतःची स्टीलचे ताट वाटी ग्लास आणि पाण्याची बाटली सोबत ठेवतो सेवक रस्त्यातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतात रस्त्यावर कचरा टाकणे उघड्यावर शौच विसर्जन टाळणे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी सामाजिक सेवांचे एक मोठे उदाहरण आहे त्यांच्या नेतृत्वात देहदान अवयव दान रुग्णवाहिका सेवा रक्तदान व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता मोफत वेदपाठ शाळा मोफत शैक्षणिक सुविधा ही दिल्या जात आहेत भावी पिढीसाठी हा उपक्रम दीपस्तंभ ठरत आहे. यावेळी पीठ महिला निरीक्षका सीमा पाटील मुख्य पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हा निरीक्षक विजय लगड सह जिल्हा निरीक्षक रमेश लोकरे, जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी सह जिल्हा अध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी महिला जिल्हा अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा अध्यात्मिक प्रमुख तुकाराम पाटील जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहीते जिल्हा युवा अध्यक्ष अमोल पाटील जिल्हा कर्नल रुपेश सुतार प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे पीठ विकास ब्रिगेडियर शोभा धनवडे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुरेश लोहार ब्लड इन प्रमुख गुरुप्रसाद माळी शिरोळ तालुका अध्यक्ष महेश फल्ले महिला तालुका अध्यक्षा सुनीता हेरवाडे माजा तालुका महिला अध्यक्षा सुमित्रा गावडे सचिव राजाराम काळे माजी तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण रमेश गावडे नितीन नरळे दीपक पाटील यांच्यासह विजय माळी शंकर बेनाडे मारुती नंदीवाले गणपती मोरे देवराम जंगले वैभव पाटील विवेक पाटील सुभाष माने शिवाजी जाधव राहुल राजमाने परशराम नंदीवाले यांच्यासह तालुक्यातील युवा सेना संग्राम सेना महिला सेना उपस्थित होते.