Krishnat Mali

नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC) (भारत सरकार, कॉर्पोरेट मंत्रालय में पंजीकृत) महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार का होगया समापन


मुंबई: रविवार, दि. 17 अगस्त 2025,
मीरा-भाईंदर, मुंबईनागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)
(भारत सरकार, कॉर्पोरेट मंत्रालय में पंजीकृत)
महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार
माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर की प्रमुख उपस्थिति और मार्गदर्शन में महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार का सफल आयोजन किया गया। इस महत्वपूर्ण आयोजन में महाराष्ट्र राज्य के 42 प्रमुख अधिकारियों ने सक्रिय रूप से भाग लिया।

आयोजन का नेतृत्व महाराष्ट्र राज्य निदेशक श्री देवेंद्र वाखारिया एवं उनकी टीम द्वारा किया गया।



प्रशिक्षण सत्र के दौरान –

महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर ने विस्तार से बताया कि Citizen Rights Protection Council (CRPC) क्या है, उसकी क्या जिम्मेदारियाँ हैं और समाज की सेवा हेतु प्रत्येक अधिकारी कैसे निष्ठा और प्रतिबद्धता से कार्य कर सकता है।

अधिकारियों को यह भी मार्गदर्शन दिया गया कि समाज की तकलीफ़ों को समझना, नागरिकों की शिकायतों का समाधान करना और न्याय दिलाने के लिए सहयोग करना ही CRPC का मूल उद्देश्य है।
डिविजनल डायरेक्टर जनरल श्री चंद्रकांतजी धोत्रे सर
महाराष्ट्र ज़ोनल डायरेक्टर श्री गणेशजी नावाडे सर ने भी अधिकारियों को उनके कार्य एवं समाजिक उत्तरदायित्व पर विशेष प्रशिक्षण दिया।
पूरे कार्यक्रम का मंच संचालन एवं प्रबंधन श्री संजय चंदारानाजी द्वारा किया गया।
इस अवसर पर श्री गौरव शाहजी, श्री संजय गांधीजी, श्री जिनेश बगड़ियाजी तथा अन्य वरिष्ठ अधिकारियों ने भी सेमिनार को सफल बनाने में विशेष योगदान दिया।


महाराष्ट्र के उन सभी 42 अधिकारियों का हृदय से आभार जिन्होंने इस प्रशिक्षण में भाग लेकर अपने कर्तव्य और समाज सेवा की शपथ को और दृढ़ बनाया।


यह सेमिनार केवल एक बैठक नहीं था, बल्कि यह एक मुख्य विशेष आयोजन था जिसने सभी अधिकारियों को यह प्रेरणा दी कि –
नागरिकों के अधिकारों की रक्षा करना,
समाज की समस्याओं को समझकर उनका समाधान करना,
और न्याय दिलाने की दिशा में सक्रिय सहयोग करना ही हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है।
हम सभी को यह संकल्प लेना है कि निष्ठा, परिश्रम और ईमानदारी से कार्य कर CRPC के माध्यम से समाज को सहयोग देंगे।

संपूर्ण प्रशिक्षण एवं आयोजन को सफल बनाने हेतु, मैं…

1. माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर
2. श्री गणेशजी नावाडे सर
3. श्री चंद्रकांतजी धोत्रे सर

एवं महाराष्ट्र की संपूर्ण CRPC टीम

✍️ देवेन्द्र वखारिया
महाराष्ट्र राज्य निदेशक

नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)

जय हिंद। वंदे मातरम।

राज्या मध्ये मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व ३५ जिल्हया मध्ये कंत्राटदार यांचे भव्य , तीव्र ,उग्र धरणे आंदोलन


कोल्हापूर: महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग,जलजीवन मिशन अ़तर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील* अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत व वर दिलेल्या विविध विभागांचे मागण्या यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या १० महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत.तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रेही दिले आहे. पण याबाबत फक्त संबंधितांचे सचिव स़बधित इतर मंत्री यांच्या कडून फक्त कोरडे बैठकीचे आश्वासन दिले जात आहे. यापुढे हा विषय जातच नाही.हि राज्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे.

या शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आमचे कंत्राटदार अभियंता बंधु यांनी आपले जीवन संपविले हा धक्का राज्यातील कंत्राटदार यांना जबरदस्त बसला यामुळे निराशा पोटी राज्यातील अनेक कंत्राटदार यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या जीवनाचे बरेवाईट करण्याची घोषणा केली होती , परंतु राज्य संघटनेने तो आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ,यासाठी आपल्या अनेक बांधवांनी आपला देह त्यागला आहे, तेव्हा कुठे हा सुवर्ण दिन आपल्या जीवनात पहावयास मिळत आहे याची जाणीव करून दिली ,अशा शुभदिनी हे कृत्य करू नये, यासाठी कंत्राटदार यांचे मतपरीवर्तन केले ,यामुळे पुढील सर्व अनर्थ टळला . तसेच राज्यातील कंत्राटदार यांच्या नावावर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जीवाचे बरेवाईट करून घेणारा कंलक दुर करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. राज्याचा विकासाचा गाडा हा दोन चाकावर आहे एक चाक शासन ,प्रशासन आहे दुसरे चाक विकासाची कामे करणारे कंत्राटदार आहेत याची जाणीव सुद्धा शासन विसरले आहे सदर कंत्राटदार यांना कुटुंब व इतर‌ चरितार्थ आहे ,इतर अनेक कोटी संख्येने असलेला वर्ग कंत्राटदारांवर अवलंबून आहे याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांच्या रोजच्या दैनंदिन मधुन दुर्दैवाने दिसत नाही.



यासाठीच कालच तिन्ही राज्य संघटनेची बैठक जबरदस्त संख्येच्या उपस्थितीत online पद्धतीने पार पडली.या बैठकीत शासन कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके न देणे व इतर‌ अनेक विषयांवर निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ शासनाच्या विरोधात संबंध महाराष्ट्राच्या ३५ जिल्हा मध्ये‌ मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे व उग्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे वतीने देण्यात आलेची माहिती कंत्राटदार शंकरराव पाटील यांनी दिली

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्या जवळ एचपी पेट्रोल पंपा समोर गुजरात ट्रॅव्हल्स ला अपघात

कोल्हापूर: पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाचे काम बंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पावसामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही दि.29 जुलै रोजी रात्री 10 चे सुमारास बेंगलोर हुन गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला येथील मंगरायाची वाडी फाटा येथील एचपी पेट्रोल पंप समोर गुजरात ट्रॅव्हल्स या कंपनीची ट्रॅव्हल्स वेगाने आल्याने ड्रायव्हरला ड्रायव्हरशेनचा अंदाज आला नसल्याने ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने गाडी दोनशे फुट रस्त्यावरून फरफटत जाऊन डिव्हायडर साठी लावलेले फायबरचे व सिमेंटचे डिव्हायडर फोडून रस्त्याच्या भरावासाठी टाकलेल्या मातीमध्ये जाऊन अडकली

यामध्ये गाडीच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुल जीवित हाणी कोणतीही झालेली नाही गेल्या दोन महिन्यात 10 ते 15 अशा मोठ्या मोठ्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स ना याच ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागले आहे रस्ता प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालक व सामान्य नागरिकांना होत आहे.

श्री क्षेत्र जोतिबा (वाडी -रत्नागिरी) येथे श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांची कोल्हापूर शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेने केल पार्किंग, वाहतुकीचे नियोजन

कोल्हापूर: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक ३०/०७/२०२५ ते दिनांक ३१/०७/२०२५ रोजी पावेतो श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा साजरी होत आहे. सदर यात्रा काळात महाराष्ट्र राज्यातुन व इतर राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक आपल्या मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येतात, जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या प्रचंड असते तसेच वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक रस्त्याची परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गांवर मोटार वाहनांची कोंडी होऊन वाहतुकीची समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षीत ठेवणे आवश्यक असलेने —

मा. जिल्हाधिकारी सो, कोल्हापूर यांनी दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी.बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टॅन्ड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यु.डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पार्किंग करणेस मनाई (नो पार्कंग झोन) केले बाबत अधिसुचना काढलेली आहे.

तसेच मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी सदर यात्रा कालावधीमध्ये श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर सुरक्षित वाहतूकीचे अनुषंगाने प्रवेश बंद, सुरु व एकेरी मार्ग, नो पाकींग, पार्कींग ठिकाणे बाबत दिलेले निर्देश खालील प्रमाणे –

(यात्रा विषयक अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून)

यात्रा भरत असताना एनएच-४ महामार्ग, टोप, गिरोली ते जोतीबा डोंगर, केर्ली ते जुने आंब्यांचे झाड ते जोतीबा डोंगर, वाघबीळ, माले फाटा, दानेवाडी फाटा, दानेवाडी क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड ते जोतीबा डोंगर या सर्व मार्गानी भाविक डोंगरावर आपआपल्या वाहनांनी जातील.

अ) यात्रा भरताना व संपल्यानंतर वाहतुक प्रवेश बंद, एकेरी वाहतुक करण्यात आलेले मार्ग :-

१ दि.३१/०७/२०२५ रोजी पहाटे ०६:०० वा. चे सुमारास यात्रा संपल्यानंतर मोटार वाहने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात जोतिबा डोंगरावरुन घाट रस्त्याने खाली उतरणार असल्याने टोप, केलीं फाटा, वाघबीळ, माले फाटा (दानेवाडी), गिरोली गांव या सर्व मार्गावरुन जोतिबा डोंगरावर वाहनांना जाणेस आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येईल. आरती सोहळा कार्यक्रमाकरीता येणा-या भाविकांनी पहाटे ०६:०० वा. च्या पुर्वीच जोतिबा डोंगरावर जाणेचे आहे.

२ घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने केलीं मार्गे तसेच दानेवाडी फाट्यावरुन वाघबीळ किंवा गिरोली मार्गे कोल्हापुर व इतर ठिकाणी एक दिशा मार्गे जातील.

३मालवाहू ट्रक, तीन चाकी प्रवासी व माल वाहतुक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाणेस दिनांक ३०/०७/२०२५ रोजीचे ००:०१ वा पासुन यात्रा संपेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. व्यापा-यांनी आपले मालाची वाहतुक यापूर्वीच करुन घेणेची आहे. (पाणी पुरवठा टैंकर वगळून)

केर्ली फाटा येथे सर्व मोटार वाहनांना (एस.टी. बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंद केले नंतर जोतिबा डोंगर ते केलीं पार्किंगतळ या दरम्यानची एस. टी. बसेसची वाहतुक दोन्ही बाजुने चालु राहील.

चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रेच्या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ वा पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी सकाळी यात्रा संपेपर्यंत यात्री निवास कॉर्नर पासुन पुढे व यमाई मंदिर कॉर्नर पासुन पुढे दुचाकी मोटार वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत कोल्हापुर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, माल वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर्स, इ वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी ते कोल्हापुर मार्गावर ये जा करणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा कोडोली वाठार एन एच ४ राष्ट्रीय महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

ब) नो पार्कंग झोन-

०६ दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी. बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टॅन्ड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यु. डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानचे रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पार्किंग करणेस मनाई (नो पार्कींग झोन) करण्यात येत आहे. मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना

क) मोटार वाहन पार्किंग व्यवस्था :-

१ यमाई मंदिर पाठीमागील बाजु

२ एमटीडीसी परिसर

3 तळ्यावरील पार्किंग

४ यमाई मंदिर डावी बाजु

दुचाकी

दुचाकी

दुचाकी / चारचाकी

चारचाकी
५ यमाई मंदिर उजवी बाजु

६ यमाई मंदिर वळणावरील/यमाई शाळा परिसर

चारचाकी

७जुने एस टी स्टैंड समोर वळणावर

चारचाकी

पिराचा कडा (टोल नाक्या समोरील पार्किंग)

चारचाकी

९ नवीन एस टी स्टँड आतील बाजु

चारचाकी

१० नवीन एस टी स्टैंड पाठीमागील बाजु

चारचाकी

११मेन स्वचारचाकी

१२ग्रामपंचायतीजवळअवजड / मोठी वाहने

१३ सेंट्रल प्लाझा आपत्कालीन

अवजड / मोठी वाहने

डोंगर माथ्यावरील पार्किंग अपुरे पडल्यास किंवा जोतिबा डोंगरावर जाणेस एस.टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल अशा वेळी भाविकांनी आपली सर्व प्रकारची वाहने खालील ठिकाणी पार्किंग करुन स्वखर्चाने एस.टी. बसेसने जोतिबा डोंगरावर जावे आणि यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी व भाविकांना होणा-या अडचणी व त्रास टाळण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,

राखीव पार्किंग ठिकाणे :-

१) केर्ली हायस्कुल मैदान

२) हॉटेल बिलीयन स्टार शेवताई मळा

३) श्रावणी हॉटेलच्या पाठिमागे पठारावर

ड) कोल्हापूर जिल्हयातील अती पर्जन्यवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे रस्ते बंद झालेस वाहतुक मार्गात खालील प्रमाणे

अंशतः बदल करण्यात येणार आहेत.

१ षष्टी यात्रेकरीता जाणारी सर्व मोटार वाहने टोप फाटा सादळे मादळे गिरोली गांव गिरोली घाट मार्गे श्री क्षेत्र जोतिबा येथे जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहेत.

२ घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने दानेवाडी फाट्यावरुन वाघबीळ, दानेवाडी-माले-कोडोली-वारणा-वाठार मार्गे कोल्हापुर व इतर ठिकाणी एक दिशा मार्गे जातील.

३ जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतुक दोन्ही मार्गाने चालु राहील.

४ वाघबीळ व शाहुवाडीकडुन दानेवाडी मार्गे येणारी सर्व वाहने ही बोरपाडळे-कोडोली-गिरोली मार्गे जोतिबा डोंगरावर जातील.

५ दि.३०/०७/२०२५ रोजी ००:०१ पासुन दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत कोल्हापुर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, माल वाहतुक करणारे ट्रॅक्टर्स, तीन चाकी, इ वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी-कोल्हापुर मार्गावर ये जा करणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा-कोडोली-वाठार-राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचा वापर करावा.

टिप :- वरील प्रमाणे प्रवेश मार्ग बंद, सुरु करणे, नो पार्कंग झोन, पार्कीग ठिकाणे यामध्ये परीस्थीती व

आवश्यकतेनुसार बदल करणेत येतील.

वरील प्रमाणे वाहतूकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद, नो पार्कींग झोन हे नियमन दि.३०/०७/२०२५ रोजी ००.०१ वा. पासून

दि.३१/०७/२०२५ रोजी यात्रा संपेपर्यंत करण्यात येईल.

(सध्या पाऊसाळा ऋत सुरु असलेने पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडल्यास घाट माथ्यावरील मार्ग धोकादायक व निसरडा होतो अशावेळी वाहनधारकांनी योग्य त्याप्रकारे वाहन चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे डोंगरावरील पार्किंग ठिकाणी चिखल होत असल्यामुळे वाहने पार्किंग करताना वाहन फसण्याची शक्यता असलेने आपले वाहनास चांगले टायर असलेले वाहन यात्रा कालावधीत वापरावे. अशी माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अतर्गत अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे देण्यात आले 650 विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे.


यवतमाळ: यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ऑपरेशन प्रस्थान उपक्रमातर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये 7500 युवकानी सह‌भाग घेतला होता. तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे, व ग्राम पातळीवरून शहरी भागापर्यंत खेळाडूना संधी मिळावी, याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्याच धतीवर मुलीना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे हेतूने दिनाक 21 एप्रिल 2025 ते 29 में 2025 पर्यत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फ ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमागत 1800 मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून व संरक्षणाची क्षमता वाढली आहे. दि. 07/07/2025 पासून ऑपरेशन प्रस्थान चा दुसरा टप्पा नवीन स्वरूपात सुरु झाला आहे. जिल्हयातील शाळा व महाविद्‌यालयांमधील 30000 वि‌द्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देणे तसेच सायबर सुरक्षा इंटरनेटच्या वापरातील सभांव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर गुन्हयांपासून संरक्षण, नशामुक्त समाज मोहिम, नैतिकता व नीतिमता, सामाजीक जबाबदारी याबाबद वि‌द्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहेत.

पोलीस विभागाच्या वतीने किशोरवयीन शाळकरी मुला-मुलीसाठी ऑपरेशन प्रस्थान वेगळ्या पद्धतीने पुनश्च नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. शाळकरी मुला मुलीसाठी वैद्यकीय बाबी, सायबर सुरक्षा, नैतिकता आणि वाहतुकीचे नियम, यासंबंधी माहिती देणे. या उपक्रमांचा उ‌द्देश उपचारापेक्षा प्रतीबंध चांगला तसेच सशक्त नागरिक म्हणून वि‌द्यार्थ्यांना घडवणे विशेषतः किशोरवयीन मुला-मुलीमध्ये सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासारख्या मुद्दायांवर जागरूकता निर्माण करणे हा आहे. सदर प्रशीक्षणाची सुरुवात दी. 07/07/2025 पासून करण्यात आली असुन आतापर्यंत एकूण 2165 वि‌द्यार्थ्यांना यशस्वीरीत्या प्रशीक्षण देण्यात आले. दि. 21/07/2025 ते 22/07/2025 असे दोन दिवस, अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येतील एकूण 650 वि‌द्यार्थीनीना प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुलीनी मोकळ्या पणाने त्यांचे प्रश्न विचारले तसेच चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अभ्यंकर कन्या शाळेची वि‌द्यार्थिनी कु.प्रीती महेंद्र ढाकरगे हिने तामिळनाडू मदुराई येथे पार पडलेल्या 6 व्या खेलो इंडिया युध गेम स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. एकाच वर्षीच्या शैक्षणिक क्षेत्रात सलग 2 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत तिने पदक पटकावले. याचप्रमाणे या वर्षी बिहार पार पडलेल्या 7 व्या खेलो इंडिया युध नेम्स मध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय फोकस
स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीब‌द्दल महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे 5 लाख व 3 लाख रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देऊन तिचा सन्मान केला, खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सलग दोनदा सहभागी होऊन पदक पटकावणारी आणि महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारची क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त करणारी ती विदर्भातील पहिली खेळाडू ठरली आहे.



वि‌द्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक सशक्तता, स्वसंरक्षण व सामाजिक सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्व अधोरेखित झाले. आनंद भुसारी व त्यांची टिम यांनी स्वसंरक्षण करीता मुलीना कराटे चे प्रत्यक्ष धडे दिले. डॉ. वृषाली माने मॅडम स्त्री रोग तज यांनी वि‌द्यार्थ्यांना कीशोरवयात होणारे शारीरीक बदल व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परीणाम याविषयी माहीती दिली. डॉ. सरफराज अहमद सौदागर सर (मानस शास्त्रज) मानसिक आरोग्य राखण्यासाठी, नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, सामाजिक सबंध जपणे, आणि तणाव व्यवस्थापित करणे याब‌द्दल त्यांनी मार्गदर्शन केलेत. पो. नि. यशोधरा मुनेश्वर मॅडम यांनी मुलीवरील वाढते अत्याचार, काळजी व उपाययोजना तसेच या वयात कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे जसे कि अभ्यास करिअर या ब‌द्दल माहिती दिली. पोनि देवकते साहेब (वाहतूक शाखा यवतमाळ) वाहतूक व वाहतुकीचे नियम ते तोडल्यास होणारे दंड व होणारे अपघात, अपघाताचे दुष्यपरिणाम या सबंधी याविषयी माहीती दिली सपोनी प्रकाश तायडे सायबर विषयक गुन्हे, फ्रॉड व त्यातून होणारी फसवणूक कशी टाळावी इंटरनेटच्या वापरातील संभाव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या सदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर संरक्षण याविषयी यांची माहीती दिली पो. नि. सतिश चवरे सर स्थानिक गुन्हे शाखा यानी नैतिकता व सामाजीक, जबाबदारीची जाणीव, आत्मसन्मान, इतरांप्रती आदर, तसेच योग्य-अयोग्य वर्तनाचे भान यासंदर्भात संवाद साधला.

तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मराठी मीडीयम, इंग्रजी मीडीयम, शासकीय शाळा, खाजगी शाळा अशा सर्व शाळकरी वि‌द्यार्थ्यां करीता सदर प्रशीक्षण राबविण्यात येणार आहे.


सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यानी केलेत व मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणाचे आयोजन पोनि दीपमाला भेडे, पोनी. वागतकर कल्याण शाखा सपोनि शुभांगी गुल्हाने जनसंपर्क कार्यालय, सपोनि माधुरी उबरकर HC निलेश खंदारे, पोलीस अंमलदार देवन्द्र गोडे, अजय निंबोळकर, सुरज वसुले महिला पोलीस अंमलदार नलिनी धोटे, भारती चव्हान, जया काळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अभ्यंकर कन्या शाळेच्या सहकार्याने करण्यात आले. सदर कार्यक्रमकरिता अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येथील सहसचिव श्री मोहन गांधी सर महीला शिक्षण मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती मोहना गंगमवार मॅडम व शिक्षक कर्मचारी वृंद, वि‌द्यार्थी वि‌द्यार्थिनी हजर होते.

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील पुलाखाली अवजड ट्रक अडकल्याने एक तास झाली वाहतूकीची कोंडी



कोल्हापूर: पेठवडगाव हून येत असणारा HR-67 D-4380 हा अवजड ट्रक पुणे बेंगलोर महामार्गावरील टोप येथील पुला खालून वाठारकडे जात असताना टोप येथील पुलाची उंची कमी असल्याने उंच असणारा ट्रक पुलाखाली अडकला त्यामुळे कोल्हापूरहून पेठवडगाव कडे जाणाऱ्या वाहनांची सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सदर पुलाची उंची कमी असल्याचे ट्रक ड्रायव्हरला अंदाज आला नसल्याने त्यांनी ट्रक गतीने पुलाखालून घेतला जवळपास ट्रकचा अर्धा भाग अडकला होता यावेळी

स्थानिक प्रवाशांच्या मदतीने व
वाहन चालकांच्या माध्यमातून ट्रक बाहेर काढण्यास मदत झाली अशा घटना या वारंवार या महामार्गाचे पुला खाली होत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे जास्त उंचीचे अवजड वाहन जाण्यास व येण्यास बंदी असल्याबाबतचे फलक लावलेले दिसत नाहीत आशा सर्वच ठिकाणी फलक लावणे गरजेचे असल्याने प्रशासनाने या बाबतीत सदर महामार्गावरील सर्वच पुलांच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावावे त्यामुळे अवजड वाहन चालक सावध होऊन दुसऱ्या मार्गाने वाहतूक करू शकतात त्यामुळे असे कोणतेही प्रकार घडू नयेत व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून व वाहन चालकातून होत आहे.

सैय्यद पिंप्री परिसरात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलीसांच्या जाळयात नाशिक तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई


नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे दि.०४/०७/२०२५ रोजी दुपारचे सुमारास सैय्यद पिंप्री येथील फिर्यादी श्री धनंजय झोमान यांचे बंद घराचे दरवाजाले कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने एकुन २,५५,०००/- रूपये किंमतीचा ऐवज बोरून नेला म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं १०३/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०५(अ) ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर घरफोडीचे गुन्हयाचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांचे पथकाने यातील आरोपीताची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबीचे अचुक विश्लेषन करून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे, तपास पथकाने सराईत गुन्हेगार नामे योगेशकुमार देविदास तायडे, वय ४३. हल्ली रा. रिगल हिल, खडकी, पुणे मुळ रा. जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली त्याने दि. ०४/०७/२०२५ रोजी मोटर सायकलवर सैयद पिंप्री या गावी जावुन, बंद घरांची टेहाळणी करून वरील बंद घर फोडून सोन्या-यांदीचे दागिने चोरी केल्याबी कबुली दिली आहे.

यातील आरोपी योगेशकुमार तायडे यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे कब्जातुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिन्यांपैकी ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या बस्तु, रोख ३४,५००/- रूपये, गुन्हयात वापरलेली यामाहा कंपनीची मोटर सायकल व हेल्मेट, मोबाईल फोन असा एकूण ४,६८,९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीवर यापूर्वी खडकी पोलीस ठाणे जि. पुणे येथे खुन व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे, तसेव उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे देखील चोरीचा गुन्हा दाखल आहेत. सदर आरोपीकडून वरील गुन्हयाचे तपासात घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग श्री. बासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक, पोउनि अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार निलेश मराठे, योगेश पाटील, अरूण रहिरे, नवनाथ आडके, नंदु सानप, संतोष घोडेराव, विकास कराड, तसेव स्थागुशाचे पोहवा संदिप नागपुरे, सचिन गवळी, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणुन कारवाई केली आहे.

समृध्दी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद-नाशिक ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा जप्त


नाशिक : प्रतिनिधी,संतोष रायचंदे
नाशिक ग्रामीण जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने समृध्दी महामार्गावर शिवडे, ता. सिन्नर परिसरात सापळा रचुन गांजावी अवैधरित्या तस्करी करणारे दोन चारवाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे १२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे.
दिनांक १२/०७/२०२५ रोजी समृधी महामार्गाने नागपुर कडून मुंबई बाजुकडे दोन वारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठयाप्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळाली होती. बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ०४ पथके तयार करून शिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृध्धी महमार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते. दरम्यान नागपुर बाजुकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार भरधाव वेगाने येतांना दिसली, सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफिने पाठलाग केला असता, त्यापैकी स्विफ्ट कार यू-टर्न मारून नागपुर दिशेने भरधाव वेगात गेली, व अमेझ कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली. दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठाण टोलनाका परिसरात अडविले, तसेच अमेझ कार मधील चालकाने शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून, तेथून पलायन केले. सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

१२१ किलो ४२९ ग्रॅम वजनाचा गांजा (किं.रू. २४,२८,५८०/- चा), वाहतुक करण्यासाठी वापलेली एक सफेद रंगाची मारूती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होण्डा अमेझ कार, ०३ मोबाईल फोन, १५,००० रूपये रोख असा एकुण ३६,२९,५८०/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीची नावे:-

१) भारत नारायण चव्हाण, वय ३५, रा. आण्णाभाऊ साठे नगर, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

२) तुषार रमेश काळे, वय २७, रा. ज्ञानेश्वर रोड, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

३) संदिप कवरू भालेराव, वय ३२, रा. गंगानगर, नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

४) सुनिल भास्कर अनार्थै, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर (फरार)


यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपले कब्जात करण्यासाठी बाळगुन त्याची अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेविरूब्द सिन्नर पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०(ब), (ग), (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ताब्यात असलेले आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची १६/०७/२०२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

सदर गुन्हयातील फरार आरोपी सुनिल भास्कर अनार्थे हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गॅंगचा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड, सातपुर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये मोक्का, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या श्रीरामपुर व शिर्डी परिसरात वास्तव्यास आहे. तसेब त्याचा वरील साथीदार संदिप कचरू भालेराव यावेवर देखील पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ल्यात दरोडा व बोरी याप्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे ओडीसा राज्यातून चारचाकी वाहनांमधुन गांजावी तस्करी करत होते, तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विक्री कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, सपोनि जिवन बोरसे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारूंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबळे, प्रितम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रविंद्र गवळी यांचे पथकांनी सदरची कामगिरी केली आहे.

मालेगाव शहरात फायर करून प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद देशी बनावटीचे पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक: प्रतिनिधी संतोष रायचंदे मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुरनं १६३/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी अनिस अहमद शकिल अहमद, रा. के. जी. एन. नगर, मालेगाव यांनी त्यांचा भाऊ अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद यास त्याचे इतर इसमांशी झालेल्या भांडणात मदत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी अनिस अहमद यांना शिवीगाळ करून “आज तुझे जानसे मार दूंगा” असे म्हणुन आरोपी अख्तर काल्या याने त्याचे हातातील गावठी क‌ट्टा फिर्यादीचे दिशेने धरून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने राऊंड फायर केले, त्यात एक राऊंड फिर्यादीचे डाव्या पायाचे गुडघ्याला लागुन त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या व त्याचे साथीदार हे फरार झाले होते.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी यातील आरोपीतास तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पवारवाडी पोलीसांचे पथक रवाना केले होते. सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी अस्तर काल्या याने त्याचे इतर साथीदारांसह मालेगाव शहरातून पलायन केले होते, त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना खब-यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा चाळीसगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथकाने वरील गुन्हयाचे समांतर तपासात चाळीसगाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद, वय ४०, 1. के. जी. एन. नगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, दि.२४/०६/२०२५ रोजी फार्मसी कॉलेज परिसरात त्यास मालेगावातील शफिक उर्फ जॉली दादा यावे इतर ०३ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकुने वार करून जखमी केले होते. सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काल्या याचा मोठा भाऊ अनिस अहमद याने त्यास मदत केली नाही याचा राग मनात धरून त्याचेवर गावठी क‌ट्टयामधून फायर केल्याची कबुली दिली आहे.

यातील आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकिल अहमद याचे अंगझडतीमधुन एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. त्यास वरील गुन्हयाचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यावेवर यापुर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी, आझादनगर, मालेगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा तयारी, आर्म अॅक्ट, खंडणी, प्राणघातक हल्ला, दंगा, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थामिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, सचिन वराडे, संदिप राठोड, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने यातील आरोपीस ताब्यात घेवुन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले आहे.

मालेगावातील सुजन टॉकीज परिसरात झालेल्या खुनाचा १२ तासात उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

.
नाशिक : प्रतिनिधी संतोष रायचंदे
दि. २६/०६/२०२५ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकिजचे आवारात मोकळे जागी एक २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. सदरसा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम २५, एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव यांचा असलेचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रुमालाने (गमछाने) गळा आवळून जिवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुरनं १६९/२०२५ भा.न्या
स.कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन यातील मयत इसन नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली. घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा एका मोटर सायकलवर बसुन गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेवुन, तासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेतचे पथकाने संशयीत नामे विशाल मारूती गवळी, वय ३८, रा.एच.पी. गॅस गोडाऊन समोर, कैलास नगर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करुन आपआपसात वाद झाल्याचा राग मनात धरून, भगव्या रंगाचे रुमालाने (गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावनी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर , गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगीरी केली आहे.