रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सरोळी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न १० हजार हून भाविकांची उपस्थिती _____ स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप





कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवारी १० डिसेंबर रोजी सरोळी ता आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रम वाटप सोहळा संपन्न झाला
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थाना पासुन पादुकाची भव्यदिव्य रथातून शोभायात्रा निघाली यामध्ये निशान धारीपुरुष- महिला कलशधारी महिला, भजन व महिलांचे लेझीम पथक हलगी वाद्य व तुतारी च्या गजरात ही शोभायाता गावातील प्रमुख मार्गावरुन जात ती १०.३० वाजता विविध पथक व ढोल ताशाच्या निनादात कार्यक्रम स्थळी पोचली ११ वाजता पुरोहितांच्या वतीने यजमा द्वारे गुरुपूजन सोहळा संपन्न झाला गुरुपूजना साठी हजारो भाविकांच्या गुरु पूजनाची व्यवस्था जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते १२.३० वाजता आरती संपन्न झाली.

त्या नंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटी चे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.



यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय उप पोलीस अधिक्षक गडहिंग्लज विभाग रामदास इंगवले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक श्री जनार्दन नेऊगरे करवीर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरुडे मुख्य पीठ युवा निरीक्षक सुनील वीर ,पीठ लेफ्टन जनरल राजेंद्र खांबल, पीठ महिला निरीक्षक राधिका पाटील, पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम पादुका दर्शन दौरा प्रमुख सोमदे आप्पा ,ज.न.म. संस्थांनचे ट्रस्टी अभिजीत अवसरे , प्रोटोकॉल अधिकारी विक्रांत घासे व त्यांची टीम यांच्यासह इतर मान्यवर वआयोध्या उत्तर प्रदेश व हम्पी या धारवाड ठिकाणाहून आलेले साधुसंत उपस्थित होते

यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिक्षक रामदास इंगवले म्हणाले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे समाजकार्य व अध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे मला माहित नव्हतं की पेपरच्या माध्यमातून ऐकलं होतं परंतु आज संस्थानाच्या ईव्ही च्या माध्यमातून जगद्गुरु च्या कार्याची माहिती घेतल्यानंतर समजले की किती मोठे आध्यात्मिक व सामाजिक कार्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे आहे आज सरोळी येथे आम्हा सर्वांच्या हस्ते १६ घरघंटींचे गरजू महिलांना वाटप केले जात आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणून जगद्गुरूंच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या

त्यानंतर उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना तरुणांना रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे असे आवाहन केले व जिल्हा सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तगण यांना शुभाशीर्वाद दिले त्यानंतर ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट झालेल्या भक्तगणांना ४६८ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ऑनलाइन उपासक दीक्षा बाबत मार्गदर्शन व उपासक दीक्षा दिली.
त्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य चार्यजी त्यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा सुरू झाला सर्वांना महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक भक्तगण उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा सहध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील जिल्हा पदाधिकारी अमोल पाटील, महेश पाटील , रुपेश सुतार , आकाश साळुंखे, उत्तम माळवी, विवेक सुतार ,तुकाराम पाटील ,पूजा चव्हाण ,जिल्हा माजी पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील, सहनिरीक्षक रमेश लोकरे प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील, विजय धनवडे, सुभाष सुतार यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समिती आजी माझी पदाधिकारी सर्व दानशुर दाते जिल्ह्याचे ज.न.म प्रवचनकार सर्व तालुका सेवा समिती महिला सेना, युवासेना, संग्राम सेना
विषेश सहकार्य जिल्ह्य सहअध्यक्ष मधुकर बाबर आजरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आकाराम देसाई बजरंग पाटील शिवाजी सरंबळे, विठ्ठल जाधव व आजरा तालुका व सेवा केंद्र पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी दोन महिने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहिते यांनी केले आभार सामाजिक उपक्रम प्रमुख अमित लाड यानी मानले.

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम _____ स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मोफत वाटप कार्यक्रमाची जय्यत तयारी

कोल्हापूर:जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील श्री आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत स्वागत पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रे मध्ये विविध पथक असणार आहेत ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी प्रस्थान होणार आहे त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी१६ घरघंटी चे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
त्यानंतर मान्यवरांचे मनोगत संपन्न होणार आहे त्यानंतर पादुका व गुरुपूजन सोहळा आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे . त्यानंतर पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार या कार्यक्रमात उपस्थिती राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा.असे आव्हान रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत तसेच सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती
व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे..

रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे कोल्हापूर शहरात भव्य स्वागत


कोल्हापूर: कोल्हापूर शहरात आज रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे करवीर तालुक्याच्या वतीने जल्लोषात स्वागत दिनांक २७ सप्टेंबर २०२५, तेलंगणा येथील श्रीक्षेत्र उपपीठ तेलंगणा, कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय, तेलंगणा उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेले आहे. या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक तेलंगणा पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ५९ वा वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी हि दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.
तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई उपपीठ (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व गोवा या ७ उपपिठाहून देखील अश्याच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत. या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे.
या दिंडीतून, सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो लोकांची खाण्या पिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे. मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन २ स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दरदिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे.
विशेष म्हणजे हि दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे. त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगती मध्येच आहेत. एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात हि दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली. अश्याप्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन २ दिंडींसह, जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे. यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीहि दिसून येते.
या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले, कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे, सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक ऍम्ब्युलन्स चालताना आढळून आली. ज्यात एक वैद्यकीय पथकहि सेवा देताना दिसून आले आहे. अशी हि आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही तर युवा-युवती, महिला-पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले.
जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, जसे महामार्गावरील ऍम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान, मरणोत्तर अवयव दान, गरीब मुलांसाठी मोफत CBSE बोर्डचे शिक्षण, सर्व जातीपंथांच्या मुला-मुलींसाठी मोफत वेदपाठशाळा, रक्तदान, व्यसनमुक्ती, आपत्कालीन सेवा, दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अश्या अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखले गेला आहे. त्यांच्या या विविध समाजहितोपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवर यांचे कौतुक होत आहे.
यासोबत दुग्धशर्करा योग म्हणजे हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना ‘एक पेड माँ के नाम’, जी या सलग ३ वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरणसंरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते. म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हिरीरीने आणि सक्रिय सहभाग घेतला आहे. या दिंडींदरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रामानंद संप्रदायाच्या वसुंधरा पायी दिंडीचे उत्साहात स्वागत


कोल्हापूर: जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ तेलंगणा ते नाणिजधाम रत्नागिरी (महाराष्ट्र) या वसुंधरा पायी दिंडीचे कोल्हापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व शिरोळ तालुका सेवा समिती यांच्या वतीने जयसिंगपूर येथे हलगीच्या गजरात अश्वाच्या नाचात उत्साहात स्वागत करण्यात आले अतिशय मनमोहक सुंदर सजावट केलेल्या रथामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका पूजन शिरोळ तालुक्यातील यजमानांच्या हस्ते संपन्न करण्यात आले तसेच सुहासिनीनी पादुकांचे औक्षण करून वातावरण मंगलमय केले तसेच शुभारंभ मल्टीपर्पज हॉल जयसिंगपूर येथे पादुकांचे मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले यावेळी यजमानांच्या हस्ते पूजन करून स्वागत केले.
ही वसुंधरा पायी दिंडी रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा पिठावरून दि 27 सप्टेंबर 2025 रोजी निघाली असून या वसुंधरा दिंडीमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणासाठी ही वसुंधरा पायी दिंडी चे आयोजन केले असून यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी हजारो किलोमीटर पायी प्रवास करून 21 ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत ही दिंडी ग्लोबल वार्मिंग चे धोके काय आहेत पर्यावरणाचा समतोल कसा राखावा निसर्गाचे रक्षण कसे करावे पृथ्वीचे रक्षण कसे करावे प्लॅस्टिक वापर करू नये झाडे लावा झाडे जगवा झाडे तोडू नका प्रदूषण टाळा नदी नाले स्वच्छ ठेवा परिसरात स्वच्छता राखा अशी संदेश देणारे फलक घेऊन चालणारे युवायुवती जनजागृती करत आहेत त्याचप्रमाणे युवा युवती ग्लोबल वॉर्मिंगचे पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत या दिंडीतील हजारो अनुयायी दररोज 25 किलोमीटर पायी प्रवास करत जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत कोल्हापूर जिल्ह्यातून हातकणंगले करवीर कोल्हापूर शहरातून तसेच पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यातून नाणिजधाम च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या दिंडीमध्ये पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून दिंडी मुक्काम व दुपारची भोजन या मार्गावरती एक पेड माँ के नाम या अनुषंगाने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वृक्ष लागवड ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम फक्त संदेशापुरता मर्यादित न राहता कृतीतही उत्तरविला जात आहे या संपूर्ण यात्रेची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि अध्यात्मिक वातावरणात केली गेली आहे यात्रिकेसाठी सात्विक पौष्टिक आणि शुद्ध अन्नाची विशेष भोजन व्यवस्था केली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी टॉयलेट व्हॅन आरोग्य पथक औषधे रुग्णवाहिका याची व्यवस्था केली आहे प्रत्येक मुक्कामी निवास आणि विश्रांतीची सोय केली आहे या दिंडीमध्ये प्लास्टिकचा पूर्णतः निषेध करण्यात आला आहे प्रत्येक यात्रेकी स्वतःची स्टीलचे ताट वाटी ग्लास आणि पाण्याची बाटली सोबत ठेवतो सेवक रस्त्यातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतात रस्त्यावर कचरा टाकणे उघड्यावर शौच विसर्जन टाळणे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी सामाजिक सेवांचे एक मोठे उदाहरण आहे त्यांच्या नेतृत्वात देहदान अवयव दान रुग्णवाहिका सेवा रक्तदान व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता मोफत वेदपाठ शाळा मोफत शैक्षणिक सुविधा ही दिल्या जात आहेत भावी पिढीसाठी हा उपक्रम दीपस्तंभ ठरत आहे. यावेळी पीठ महिला निरीक्षका सीमा पाटील मुख्य पीठ जनगणना प्रमुख तुषार कदम कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हा निरीक्षक विजय लगड सह जिल्हा निरीक्षक रमेश लोकरे, जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी सह जिल्हा अध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी महिला जिल्हा अध्यक्षा प्रणाली पाटील जिल्हा अध्यात्मिक प्रमुख तुकाराम पाटील जिल्हा देणगी प्रमुख दशरथ मोहीते जिल्हा युवा अध्यक्ष अमोल पाटील जिल्हा कर्नल रुपेश सुतार प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे पीठ विकास ब्रिगेडियर शोभा धनवडे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुरेश लोहार ब्लड इन प्रमुख गुरुप्रसाद माळी शिरोळ तालुका अध्यक्ष महेश फल्ले महिला तालुका अध्यक्षा सुनीता हेरवाडे माजा तालुका महिला अध्यक्षा सुमित्रा गावडे सचिव राजाराम काळे माजी तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण रमेश गावडे नितीन नरळे दीपक पाटील यांच्यासह विजय माळी शंकर बेनाडे मारुती नंदीवाले गणपती मोरे देवराम जंगले वैभव पाटील विवेक पाटील सुभाष माने शिवाजी जाधव राहुल राजमाने परशराम नंदीवाले यांच्यासह तालुक्यातील युवा सेना संग्राम सेना महिला सेना उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्चस्ववादातून दोन गटांमध्ये हाणामारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्थेत वर्चस्व वादातून विद्यार्थांच्या दोन गटात हाणामारी झाली. शाळेच्या आवारात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्येच राहतो. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाळेत एक मुलगा व त्याचे दोन वर्गमित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद वर्चस्व वादातून झाल्याचे समजते. यामध्ये क्रिकेटची बॅट तसेच लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण होत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण होताना विद्यार्थी जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे ही दिसून आले.
दरम्यान, या वादाची माहिती मिळताच रेक्टर कोळी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना ताकीद देऊन सोडून दिले होते. मात्र, याच वादाचा राग मनात धरून रेक्टर कोळी याने दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी पीटी परेडच्या वेळी रेक्टर कोळी यांनी जखमी विद्यार्थ्याला सर्वांसमोर स्टेजवर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या हातातील पीव्हीसी पाईपने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर तसेच डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फिर्यादी पालकांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत आरोपी रेक्टर कोळी विरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकानेच हात उचलल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब व शाळेतील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.
मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान ! चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा


मुंबई : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदासस्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. जर या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन “मनाचे श्लोक” हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की,”या संदर्भात समितीच्या वतीने शासन व सेन्सॉर बोर्डाला निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवली जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटाच्या बाबतीतही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असतील.”
श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की, ‘रामायण’सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही. या तत्त्वानुसार ‘मनाचे श्लोक’ हे नाव चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ नुसार हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे हा एक गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे; तसेच सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२च्या कलम ५-ब नुसार सामाजिक सलोखा आणि नैतिकता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची आहे.’’
शेवटी श्री. घनवट यांनी म्हटले की, ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक चित्रपटातून त्वरित आणि बिनशर्त मागे घ्यावे. केंद्र आणि राज्य शासनाने भविष्यात अशा प्रकारे धार्मिक प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा अशी माहिती.
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती यांनी दिली.
हिंदू जन संघर्ष समिती, कोल्हापूर” यांच्यावतीने कोल्हापूर महानगर पालिका आयुक्तांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था – नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व जनतेच्या कररुपी पैशांचा अपव्यय याविषयी मागणीपत्र.“हिंदू जन संघर्ष समिती, कोल्हापूर” यांच्यावतीने महानगरपालिका आयुक्त
कार्यालयास हे निवेदन देण्यात आले. सध्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती भयावह झालेली आहे. शहरातील प्रमुख व आंतररस्त्यांवर प्रचंड खड्डे, उखडलेला डांबर, पावसाळ्यात साचलेले पाणी आणि आता पावसाळ्यानंतर सर्वत्र उडणारी धूळ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः संकटात आले आहे.
या रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती, कायमचे अपंगत्व व मृत्यू देखील ओढवले आहेत.धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा जीव धोक्यात आला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते, परंतु त्यातून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नागरिकांचे कराचे पैसे वाया जात आहेत.
⚖️ कायदेशीर व सार्वजनिक हिताचा आधारा बाबत ही माहिती त्यानी दिली
1. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 – नागरिकांना “सुरक्षित व आरोग्यदायी जीवनाचा अधिकार” आहे
2. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार शहरातील रस्त्यांची देखभाल ही महानगरपालिकेची कायद्याने बंधनकारक जबाबदारी आहे.
3. करदात्यांचे पैसे खर्च करून केलेली कामे ही दर्जेदार असणे आवश्यक असून, पारदर्शकता व जबाबदारी ही लोकशाहीतील मूलभूत अपेक्षा आहे.
तसेच त्यानी ठोस मागण्या ही पुढील प्रमाणे केलेल्या आहेत
कृपया पुढील माहिती ७ ते १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात तसेच ई-मेलवर उपलब्ध करून द्यावी –
1. मागील ३ वर्षांत (२०२२–२०२५) नव्याने बनविलेले / डांबरीकरण / दुरुस्ती केलेले सर्व रस्त्यांची यादी.
2. प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी जारी करण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची प्रत.
3. संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांची संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, परवाना इ.).
4. प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर व खर्च केलेला निधी व त्याचा स्रोत (फंड/योजना).
5. सदर कामांचे निरीक्षण अहवाल (Inspection Reports) असल्यास त्यांची प्रत.
6. प्रलंबित व मंजूर रस्ते कामांची अद्ययावत यादी.
तसेच सदरच्या मागण्या मान्य नाही झाल्यास त्यांनी इशाराही दिला आहे जर ही माहिती व कागदपत्रे लवकर उपलब्ध करून दिली नाहीत तर आम्हाला माहिती अधिकार कायदा 2005 चा वापर करून सर्व माहिती मागवावी लागेल. तसेच पुढील टप्प्यात आम्ही लोकायुक्त, ACB, ग्राहक न्याय मंच, न्यायालय व जनआंदोलन यांचा मार्ग अवलंब करू.तसेच त्यांनी आम जनतेला ही आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे
तसेच बोलताना त्यांनी शहरातील प्रत्येक नागरिक आपले वेळेवर कर भरतो. हेच पैसे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व विकासासाठी खर्च केले जाणे अपेक्षित आहे. पण सध्या रस्त्यांची झालेली दुर्दशा हा जनतेच्या विश्वासघात झाल्याचे त्यानी स्पष्ट केले आहेस्पष्ट आहे. म्हणूनच नागरिकांच्या हक्कासाठी हे निवेदनअतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांना सदरचे निवेदन देण्यात आल्याची माहिती
हिंदू जनसंघर्ष समिती, कोल्हापूर अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली
नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC) मुंबई महाराष्ट्र टीमच्या वतीने मीरा-भाईंदर मध्ये पोलीस प्रशासन सोबत बजावली सेवा



मिरा भाईंदर : शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी हजारो गणेशभक्त जमतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ १ च्या हद्दीत पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढण्यात येतात. मात्र, याच गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक अनुचित प्रकार करत असतात.विशेषतः महिला आणि मुलींविरोधात होणार्या छेडछाडीच्या घटनांवर यंदा कठोर कारवाईचे धोरण राबवले जाणार आहे. पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण सात पथक तयार करण्यात आले असून त्यात प्रत्येकी चार कर्मचारी असणार आहेत. हे पथक महिलांचे दागिने चोरीला जाणे व छेडछाड यावर लक्ष देणार आहेत.याच बरोबर विसर्जन स्थळी कोणत्याही होकर्सला परवानगी देण्यात आले नसल्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही. स्थानिक पोलीस ठाण्याचे देखील त्यांच्या हद्दीत व विसर्जन ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान होणार्या पाकीटमारांच्या हालचालींवरही पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांची गुप्त पथके कार्यरत होती तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून देखील विसर्जन मिरवणूक मार्गावर सातत्याने नजर ठेवली होती.वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.



मिरा-भाईंदर-वसई विरार पोलीस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ५ पोलीस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलीस आयुक्त, २८० पोलीस अधिकारी, २३०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २३० कर्मचारी, दोन स्ट्राइकिंग तसेच प्रत्येक परिमंडळामध्ये दंगल नियंत्रण पथकच्या तीन तुकड्या आणि एसआरपीच्या तीन तुकड्या तैनात होत्या
त्याचबरोबर पोलीस प्रशासना सोबत नागरिक अधिकार सुरक्षा परिषद(CRPC)चे महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर श्री देवेंद्र वखारिया यांच्या मार्गदर्शनानुसार सी.आर.पी.सी अधिकारी गौरव शहा विशाल शहा सतीश जैन जितेंद्र गांधी जिगर पटेल यांनी अकरा दिवस पोलीस प्रशासनासोबत सेवा बजावल्याची माहिती सीआर.पी.सी स्टेट डायरेक्टर देवेंद्र वखारिया यांनी दिली.