Krishnat Mali

नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC) मुंबई महाराष्ट्र टीमच्या वतीने मीरा-भाईंदर मध्ये पोलीस प्रशासन सोबत बजावली सेवा

मिरा भाईंदर : शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी हजारो गणेशभक्त जमतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ १ च्या हद्दीत पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढण्यात येतात. मात्र, याच गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक अनुचित प्रकार करत असतात.विशेषतः महिला आणि मुलींविरोधात होणार्‍या छेडछाडीच्या घटनांवर यंदा कठोर कारवाईचे धोरण राबवले जाणार आहे. पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण सात पथक तयार करण्यात आले असून त्यात प्रत्येकी चार कर्मचारी असणार आहेत. हे पथक महिलांचे दागिने चोरीला जाणे व छेडछाड यावर लक्ष देणार आहेत.याच बरोबर विसर्जन स्थळी कोणत्याही होकर्सला परवानगी देण्यात आले नसल्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही. स्थानिक पोलीस ठाण्याचे देखील त्यांच्या हद्दीत व विसर्जन ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान होणार्‍या पाकीटमारांच्या हालचालींवरही पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्‍या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांची गुप्त पथके कार्यरत होती तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून देखील विसर्जन मिरवणूक मार्गावर सातत्याने नजर ठेवली होती.वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर-वसई विरार पोलीस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ५ पोलीस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलीस आयुक्त, २८० पोलीस अधिकारी, २३०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २३० कर्मचारी, दोन स्ट्राइकिंग तसेच प्रत्येक परिमंडळामध्ये दंगल नियंत्रण पथकच्या तीन तुकड्या आणि एसआरपीच्या तीन तुकड्या तैनात होत्या
त्याचबरोबर पोलीस प्रशासना सोबत नागरिक अधिकार सुरक्षा परिषद(CRPC)चे महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर श्री देवेंद्र वखारिया यांच्या मार्गदर्शनानुसार सी.आर.पी.सी अधिकारी गौरव शहा विशाल शहा सतीश जैन जितेंद्र गांधी जिगर पटेल यांनी अकरा दिवस पोलीस प्रशासनासोबत सेवा बजावल्याची माहिती सीआर.पी.सी स्टेट डायरेक्टर देवेंद्र वखारिया यांनी दिली.

शिवतेज मित्र मंडळ शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर येथील शिवतेज गणेश मूर्तीस नामदार उदय सामंत यांच्या हस्ते १ किलो सोन्याचा हार अर्पण

कोल्हापूर: गणेशोत्सव २०२५ कोल्हापूरातील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव एक अनोखा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे शिवतेज मित्र मंडळ, शाहूपुरी ३ री गल्ली यांच्या मंडळाने पहिल्यांदाच श्रींच्या मूर्तीस तब्बल १ किलो सोन्याचा हार अर्पण करण्याचा संकल्प त्यांनी केला होता राज्याचे उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री महाराष्ट्रा तसेच मा.नामदार श्री उदय सामंत व यांच्या शुभ हस्ते व मा.नामदार श्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याणी विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह आमदार अमल महाडिक माजी खासदार प्रा.संजय मंडलिक शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम युवा नेते ऋतुराज क्षीरसागर,अमित हुक्कीरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रामानंद संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी सचिव दिलीप कोळी सह जिल्हाअध्यक्ष मधुकर बाबर तसेच मंडळाचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सामंत यांनी कोल्हापूर वासियाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या गणेश बाप्पाच्या दर्शन येत असताना मनस्वी आनंद होत आहे तसेच गणेशास त्यानी महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला पाहिजे कोणत्या ही नागरिकाला महाराष्ट्रामध्ये अडचण कोणतीही येऊनये महायुती च्या सरकारकडून जणतेची सेवा गणेश बाप्पानी करुन घ्यावी अशी प्रार्थना यावेळी सर्वांनी बाप्पांच्या चरणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
या संकल्पास परिसरातील व शहरातील असंख्य भाविकांनी उत्स्फूर्त व मनोभावे साथ दिली असून, श्रींवरील अखंड श्रद्धा आणि भक्तीचे हे जिवंत प्रतीक ठरले आहे.

मंडळाच्या अध्यक्ष मोहित खोत यांनी सांगितले की, “मनोकामना पूर्ण झाल्यानंतर श्री गणेशा विषयीच्या भक्तिभावातून हा संकल्प साकारला गेला आहे.” नवसाला पावणारे शिवतेज गणेश या स्वरूपात भाविकांच्या जीवनात प्रसन्नता, यश व समाधान देतात, अशी श्रद्धा भाविकांमध्ये असून, या वर्षी सुवर्णहार अर्पण सोहयाद्वारे त्या श्रद्धेला एका वैभवशाली रूपाची जोड मिळली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवतेज मित्र मंडळाची मूर्ती ही ‘प्रसन्नतेचे प्रतीक’ म्हणून भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आली आहे. शहरातील भाविकांसोबतच बाहेरगावच्या भाविकांचीही मंडळाच्या श्रींच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे गर्दी होत आली आहे.
यंदाचा सुवर्णहार अर्पण सोहळा हा भाविकांच्या सामूहिक भावनांचे प्रतिक आहे. भाविकांनी आपल्या-आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर केलेले नवस व त्यातून जमा झालेली भक्तीशक्ती या संकल्पाच्या पाठीशी उभी राहिली आहे. हा हार म्हणजे सर्वांच्या भावनेतून साकार झालेला भक्तीचा सुवर्णहार आहे.


मंडळाचे पदाधिकारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मंडळ परिसरात भाविक या ऐतिहासिक क्षणासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, “श्रींच्या कृपेने प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आमची प्रार्थना आहे. सुवर्णहार अर्पण सोहळा हा सर्व भाविकांच्या भक्तीभावाचा साक्षीदार ठरला आहे. “गणेशभक्तीचा आणि सामूहिक एकतेचा हा सोहळा कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या परंपरेला एक वेगळे वैभव आणणारा ठरला आहे.

सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आणि महाराष्ट्र सह इतर राज्यात महापुराची शक्यता हवामान खात्याचाअंदाज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, विशेषतः गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांमध्ये. हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
सविस्तर माहिती:
हवामान :आज, ०१ सप्टेंबर २०२५ रोजी, कोल्हापूरमध्ये हवामान ढगाळ राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा इशारा: हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवारपासून पुढील ३ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
प्रमुख पावसाची ठिकाणे: गगनबावडा, शाहूवाडी, आजरा आणि भुदरगड या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
धरणांमधील स्थिती: धरणक्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीची पातळी वाढत असून काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना:
पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
धरण परिसरातील गावांमधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
ऑगस्ट महिन्यात अनेक भागात धुव्वाधार पावसाच्या सऱ्या कोसळल्याने आधीच बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतात पावसाचे पाणी साचत अनेक पिके पाण्याखाली गेली आहे. खास करून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेडसारख्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर आला, घरात पाणी शिरलं. आता ऑगस्ट महिना सरला असून सप्टेंबर महिना चालू झाला आहे, मात्र या महिन्यातही धडकी भरवणारा पाऊस पडेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. नद्यांच्या पाणी पातळीती ही वाढ होत असलेली दिसत आहे सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे काही राज्याची चिंता वाढणार
भारतीय हवामान विभागाने संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल, याचा एक अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये मासिक सरासरी पाऊस १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९% पेक्षा जास्त होईल. देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे काही राज्याची चिंता वाढणार आहे, तर काही राज्यांना पावसाचा थेट धोका नसला तरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात वायव्य, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी राहील.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटल कि, सप्टेंबर महिन्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर येऊ शकतात आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमधील सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. छत्तीसगडमधील महानदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रातील पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कसं असेल पावसाचे वातावरण?
महाराष्ट्रात आज पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलक्या रिमझिम पावसाचे वातावरण राहणार आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याना येलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्यासह पावसाची शक्यता

कोल्हापूर: आज ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, हलक्या ते जोरदार सरींची शक्यता आहे आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहील. जिल्ह्यात पुरामुळे काही मार्ग अद्यापही पाण्याखाली आहेत, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सविस्तर माहिती
पावसाची स्थिती मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला होता, पण आता तो कमी झाला आहे. तरीही, जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सतर्क राहावे असा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होऊ शकतो.
पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.


सांगली व सोलापूर जिल्ह्यात ३ मि.मी तर अहिल्यानगर जिल्ह्यात ६ मि.मी.आणी पुणे जिल्ह्यात ८मि.मी पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आज १०मि.मी. आणि सातारा जिल्ह्यात १५ मि.मी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपात राहील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून कडून राहील वाऱ्याचा ताशी वेग पुणे जिल्ह्यात द
१० कि.मी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ११ कि.मी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी १२ कि.मी राहील मात्र सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी राहील कमाल तपमान २७ अंश सेल्सिअस तर सांगली जिल्ह्यात जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील अनंता फोन कोल्हापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि सांगली सातारा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णता ढगाळ राहील.

सोमनाथ पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


कोल्हापूर : पेठ वडगांव येथील सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच गरूड भरारी घेत हेडऑफीस सह १५ शाखे मध्ये कामकाज सुरू असुन आज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला शिराळा बँकेचे माजी जनरल मॅनेजर चंद्रकांत माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व के.डी.सी.सी. बँकेचे माजी बँक निरीक्षक हंबीरराव वडणगे शाखा चेअरमन सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या संस्थापक चेअरमन अशोकराव माळी यांनी ३१ मार्च २५ अखेर संस्थेने केलेल्या प्रगतीचा अहवाल वाचन करून अल्पावधीत संस्थेने ३१ मार्च अखेर वसुल भाग भांडवल १कोटी ८३ लाख ५२ हजार ५०० रुपये ,
निधी २ कोटी १६ लाख १० हजार, ठेवी ३१ कोटी ५१ लाख ६५ हजार, गुंतवणूक ८ कोटी ६ लाख ९ हजार , कर्जे २६ कोटी ५३ लाख २९ हजार ,नफा ५१ लाख १६ हजार, खेळते भांडवल ५० कोटी ४३ लाख २० हजार इतका वाढता आलेख सांगितला असून संस्थेचा मुख्य उद्देश कुटीर उद्योग धंद्यांना अर्थ पुरवठा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संकल्पनेच्या साह्याने सभासदांचे व समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी सतत कार्यरत आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध कर्ज योजना करून आर्थिक पुरवठा करणेस कटीबद्ध राणार तसेच पुढील सात वर्षाची उद्दिष्टे व ध्येय धोरण संस्थेच्या रोप्यमहोत्सवा पर्यंत १०० कोटी ठेवी, ५०० कोटी व्यवसाय ,२०० कर्मचारी, ३ कोटी प्रती कर्मचारी व्यवसाय, ७० कोटी कर्जे ,कार्यक्षेत्र महाराष्ट्र,शाखा ४० अशी उद्दिष्टे असल्याची माहिती दिली तसेच संस्थेस स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ शासनाकडून कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी असून सर्व शाखा मध्ये कोअर बँकिंग प्रणालीद्वारे NEFT/RTGS त्वरित उपलब्ध लवकरच सांगली जिल्ह्यात चार शाखा सुरू करणार असल्याची माहिती दिली तसेच सभासदांनी आपले व्यवहार संस्थेमध्ये करण्याचे आव्हान केले.


यावेळी तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य श्री पी.बी. घाडगे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले व सहकाराचे महत्व पटवून दिले तसेच सहकार कायद्या बद्दल माहिती दिली संस्थेने चांगली कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी व सभासद यांचे कौतुक केले.
यावेळी सभासदांच्या दहावी व बारावी ७५ टक्के च्यापुढे मार्क मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेच्या गुणवंत कर्मचारी व पिग्मी एजंट यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाखा वडणगे यांनी चार महिन्यांमध्ये १ एक कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला त्याबद्दल संचालक मंडळ व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापिका सौ रूपाली माळी व्हा चेअरमन बजरंग माळी संचालक देवप्पा चोपडे, हंबीरराव देसावळे, महेशकुमार नाझरे, संतोष जाधव, पोपट खाडे, संपतराव पाटील, संजय धोंगडे संचालिका दिपाली माळी ,नयन पाडळकर, राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. एम बी किडगावकर तसेच सर्व शाखांचे चेअरमन व सल्लागार समिती उपस्थित होते


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पवार सर यांनी केले प्रस्ताविक असिस्टंट जनरल मॅनेजर नागनाथ माळी यांनी केले अहवाल वाचन संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री अशोकराव माळी यांनी केले आभार जनरल मॅनेजर कृष्णात माळी यांनी मांणले.

कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेने राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणूकीचे केले नियोजन

कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी राजारामपुरी येथे एकुण ५१ सार्वजनिक आगमन मिरवणुक होणार आहे. सदरची मिरवणुक ही जनता बाजार चौक ते आग्नेयमुखी मारुती मंदिर या मार्गावरून होणार आहे. याकरीता जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर हा मिरवणुक मार्ग आणि जनता बाजार चौकाकडे जाणारे सर्व मार्ग या वाहतुकीचे योग्य ते नियमन करणे गरजेचे आहे. तसेच, सदर मिरवणुकीच्या अनुषंगाने राजारामपुरी आणि जनता बाजार चौक शी संबंधीत मार्ग मोटार वाहनांना बंद व खुले करणे वन वे मार्ग शिथिल करणे बाबतचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले आहेत ते खालीलप्रमाणे-

अ)वन-वे मार्गात शिथिलता

खालील वन वे मार्ग हा सार्वजनिक मंडळाचे गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीतील वाहनांसाठी ये-जा करणेच्या कालावधी करीता शिथील करण्यात येत आहेत.

०१ जनता बाजार चौक ते आग्नेय मुखी मारुती मंदिर

ब)वाहतुकीसाठी बंद व खुले करणेत आलेले मार्ग

१ राजारामपूरी ११ वी गल्ली आग्नेय मुखी मारुती मंदिर ते जनता बाजारकडे येणा-या (राजारामपूरी मेन रोडवरील) वाहतुक दोन्ही बाजूस पूर्णपणे बंद करणेत येत आहे.

२ बाईचा पुतळा चौकाकडून ताराराणी विद्यापीठकडे (व्ही टी पाटील सभागृह) जाणारी सर्व मोटार वाहनांना बाईचा पुतळा या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकांसाठी के रामचंद्र भाऊसो कांबळे चौक (शाळा नं ९) ते शाहुमिल पोलीस चौकी हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.

३ शाहुमिल पोलीस चौकीकडून के रामबंद्र भाऊसो कांबळे चौकाकडे (शाळा नं ९) जाणारी सर्व मोटार वाहतुक शाहुमिल पोलीस चौकी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत असून सदर मोटार वाहन चालकासाठी ताराराणी विद्यापीठ (व्ही टी पाटील सभागृह) ते बाईचा पुतळा चौक हा एक दिशा मार्ग करणेत येत आहे.

४ बागल चौक येथुन जनता बाजार कडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल, सदरची वाहतुक ही बागल चौक ते बीटी कॉलेज आणि पुढे अन्य पर्यायी मार्गान मार्गस्थ होईल.

५ टाकाळा चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही मा. पी. एन पाटील बंगला किंवा रेल्वे फाटक कडे आणि पुढे अन्य पर्यायी मार्गाने मार्गस्थ होईल,

६ शहाजी लॉ कॉलेज चौक येथुन जनता बाजार चौकाकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार थांबविण्यात येईल. सदरची वाहतुक ही टाकाळा चौकाकडे किंवा परिख पुलाकडे आणि पुढे अन्य पर्यायी मागनि मार्गस्थ होईल.


क) पार्किंग व्यवस्था

०१ व्हि टी पाटील भवन परिसर

२ राजारामपुरी शाळा क्र.०९ मैदान

३ दसरा चौक

४ बिंदू चौक

वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सायंकाळी १६:०० वाजले पासून राजारामुपरी येथील सार्वजनिक श्री. गणेश मुर्तींचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत मिरवणुकीतील वाहना करीता वनवे मार्ग शिथिल व इतर सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद सुरु करणेत येत आहेत.
अशी माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली

गणेश मूर्तीचे आगमन सोहळ्याचे कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने केल वाहतुकीचे व वाहन पार्किंगचे नियोजन


कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये दिनांक २७/०८/२०२५ रोजी सार्वजनिक घरगुती गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीने होत असलेने शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली या ठिकाणावरून गणेश मुर्ती मोठया प्रमाणात खरेदी करुन मिरवणुकीने घेवून आणेसाठी नागरिक मोटार वाहनांनी येत असल्याने सदर मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडणे करीता व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता शाहुपूरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प, कुंभार गल्ली येथील वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्याकरीता सदर रहदारी नियमना करीता शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथील मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व खुले करणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :-

शाहपुरी कुंभार गल्ली :-

१. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना नाईक अँन्ड नाईक कंपनी समोर प्रवेश बंद करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून)

२. फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना ( अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) रिलायन्स मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

३. पार्वती सिग्नल चौक व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व गणेश मुर्ती घेण्यासाठी आलेल्या वाहनाना वगळून) आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

४. गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना गवत मंडई चौकात प्रवेश बंद करणेत येत आहे.

पापाची तिकटी (गंगावेश) कुंभार गल्ली:-

१. पापाची तिकटी ते बुरुड गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.

२. शाहू उद्यान गंगावेश ते कुंभार गल्ली जाणारे मार्गावर सर्व प्रकारचे वाहनांना शाहू उद्यान या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे.

३. गंगावेश चौक ते पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गावर वाहन उभे करणेस मनाई करणेत येत आहे.

बापट कॅम्प कुंभार गल्ली

१. शिरोली टोल नाका ते बापट कॅम्प कडे जाणारे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करणेत येत आहे. सदरची वाहने ही मार्केटयार्ड चौक येथून जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्थ होतील.

२. रा.छ. शाहू मार्केट यार्ड समोरुन बापट कॅम्प कुंभार गल्ली मध्ये आत जाणारी वाहने परत त्याच मार्गाने येता सर्व वाहने रिव्हरसाईड होंडा शोरुम जवळचे रस्त्याने बाहेर मार्गस्थ होतील.

नो पार्किंग:

१. गवत मंडई येथील श्री नाईकनवरे यांचे निवासस्थान जवळील कॉर्नर चौकापासून सर्व बाजूस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहनाना बगळून)


पार्किंग सुविधा :

१. शाहुपूरी कुंभार गल्ली

१) पार्वती सिग्नल चौका जवळील आयर्विन खिश्चन हायस्कुलचे पटांगणावर वाहने पार्क करतील.

२) शाहूपुरी ४ व ५ वी गल्ली येथे वाहतूकीस अडथळा होणार नाही असे पार्किंग करतील,

२. बापट कैम्प कुंभार गल्ली

१) प्रिन्स शिवाजी विदयामंदिर, शाळा क्र. ३२ जाधववाडी (बापट कैम्प) २) ओम कॉम्प्लेक्स समोरील रिकामी गुरु नानक सोसायटीची जागा, बापट कैम्प

वरील सर्व मार्ग हे दिनांक २७/०८/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजले पासून सार्वजनिक व घरगुती श्री. गणेश मुर्तीचे आगमन मिरवणूकीने होईपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करणेत येत आहेत.
अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली

नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC) (भारत सरकार, कॉर्पोरेट मंत्रालय में पंजीकृत) महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार का होगया समापन


मुंबई: रविवार, दि. 17 अगस्त 2025,
मीरा-भाईंदर, मुंबईनागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)
(भारत सरकार, कॉर्पोरेट मंत्रालय में पंजीकृत)
महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार
माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर की प्रमुख उपस्थिति और मार्गदर्शन में महाराष्ट्र स्टेट मीटिंग एवं मोटिवेशनल ट्रेनिंग सेमिनार का सफल आयोजन किया गया। इस महत्वपूर्ण आयोजन में महाराष्ट्र राज्य के 42 प्रमुख अधिकारियों ने सक्रिय रूप से भाग लिया।

आयोजन का नेतृत्व महाराष्ट्र राज्य निदेशक श्री देवेंद्र वाखारिया एवं उनकी टीम द्वारा किया गया।



प्रशिक्षण सत्र के दौरान –

महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर ने विस्तार से बताया कि Citizen Rights Protection Council (CRPC) क्या है, उसकी क्या जिम्मेदारियाँ हैं और समाज की सेवा हेतु प्रत्येक अधिकारी कैसे निष्ठा और प्रतिबद्धता से कार्य कर सकता है।

अधिकारियों को यह भी मार्गदर्शन दिया गया कि समाज की तकलीफ़ों को समझना, नागरिकों की शिकायतों का समाधान करना और न्याय दिलाने के लिए सहयोग करना ही CRPC का मूल उद्देश्य है।
डिविजनल डायरेक्टर जनरल श्री चंद्रकांतजी धोत्रे सर
महाराष्ट्र ज़ोनल डायरेक्टर श्री गणेशजी नावाडे सर ने भी अधिकारियों को उनके कार्य एवं समाजिक उत्तरदायित्व पर विशेष प्रशिक्षण दिया।
पूरे कार्यक्रम का मंच संचालन एवं प्रबंधन श्री संजय चंदारानाजी द्वारा किया गया।
इस अवसर पर श्री गौरव शाहजी, श्री संजय गांधीजी, श्री जिनेश बगड़ियाजी तथा अन्य वरिष्ठ अधिकारियों ने भी सेमिनार को सफल बनाने में विशेष योगदान दिया।


महाराष्ट्र के उन सभी 42 अधिकारियों का हृदय से आभार जिन्होंने इस प्रशिक्षण में भाग लेकर अपने कर्तव्य और समाज सेवा की शपथ को और दृढ़ बनाया।


यह सेमिनार केवल एक बैठक नहीं था, बल्कि यह एक मुख्य विशेष आयोजन था जिसने सभी अधिकारियों को यह प्रेरणा दी कि –
नागरिकों के अधिकारों की रक्षा करना,
समाज की समस्याओं को समझकर उनका समाधान करना,
और न्याय दिलाने की दिशा में सक्रिय सहयोग करना ही हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है।
हम सभी को यह संकल्प लेना है कि निष्ठा, परिश्रम और ईमानदारी से कार्य कर CRPC के माध्यम से समाज को सहयोग देंगे।

संपूर्ण प्रशिक्षण एवं आयोजन को सफल बनाने हेतु, मैं…

1. माननीय महानिदेशक श्री सुरेशजी शुक्ला सर
2. श्री गणेशजी नावाडे सर
3. श्री चंद्रकांतजी धोत्रे सर

एवं महाराष्ट्र की संपूर्ण CRPC टीम

✍️ देवेन्द्र वखारिया
महाराष्ट्र राज्य निदेशक

नागरिक अधिकार सुरक्षा परिषद (CRPC)

जय हिंद। वंदे मातरम।

राज्या मध्ये मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व ३५ जिल्हया मध्ये कंत्राटदार यांचे भव्य , तीव्र ,उग्र धरणे आंदोलन


कोल्हापूर: महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग,जलजीवन मिशन अ़तर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील* अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत व वर दिलेल्या विविध विभागांचे मागण्या यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या १० महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत.तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रेही दिले आहे. पण याबाबत फक्त संबंधितांचे सचिव स़बधित इतर मंत्री यांच्या कडून फक्त कोरडे बैठकीचे आश्वासन दिले जात आहे. यापुढे हा विषय जातच नाही.हि राज्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे.

या शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आमचे कंत्राटदार अभियंता बंधु यांनी आपले जीवन संपविले हा धक्का राज्यातील कंत्राटदार यांना जबरदस्त बसला यामुळे निराशा पोटी राज्यातील अनेक कंत्राटदार यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या जीवनाचे बरेवाईट करण्याची घोषणा केली होती , परंतु राज्य संघटनेने तो आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ,यासाठी आपल्या अनेक बांधवांनी आपला देह त्यागला आहे, तेव्हा कुठे हा सुवर्ण दिन आपल्या जीवनात पहावयास मिळत आहे याची जाणीव करून दिली ,अशा शुभदिनी हे कृत्य करू नये, यासाठी कंत्राटदार यांचे मतपरीवर्तन केले ,यामुळे पुढील सर्व अनर्थ टळला . तसेच राज्यातील कंत्राटदार यांच्या नावावर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जीवाचे बरेवाईट करून घेणारा कंलक दुर करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. राज्याचा विकासाचा गाडा हा दोन चाकावर आहे एक चाक शासन ,प्रशासन आहे दुसरे चाक विकासाची कामे करणारे कंत्राटदार आहेत याची जाणीव सुद्धा शासन विसरले आहे सदर कंत्राटदार यांना कुटुंब व इतर‌ चरितार्थ आहे ,इतर अनेक कोटी संख्येने असलेला वर्ग कंत्राटदारांवर अवलंबून आहे याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांच्या रोजच्या दैनंदिन मधुन दुर्दैवाने दिसत नाही.



यासाठीच कालच तिन्ही राज्य संघटनेची बैठक जबरदस्त संख्येच्या उपस्थितीत online पद्धतीने पार पडली.या बैठकीत शासन कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके न देणे व इतर‌ अनेक विषयांवर निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ शासनाच्या विरोधात संबंध महाराष्ट्राच्या ३५ जिल्हा मध्ये‌ मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे व उग्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे वतीने देण्यात आलेची माहिती कंत्राटदार शंकरराव पाटील यांनी दिली