. नाशिक : प्रतिनिधी संतोष रायचंदे दि. २६/०६/२०२५ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकिजचे आवारात मोकळे जागी एक २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. सदरसा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम २५, एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव यांचा असलेचे तपासात निष्पन्न झाले होते. यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रुमालाने (गमछाने) गळा आवळून जिवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुरनं १६९/२०२५ भा.न्या स.कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन यातील मयत इसन नामे अमोल मोहन निकम, वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली. घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा एका मोटर सायकलवर बसुन गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेवुन, तासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेतचे पथकाने संशयीत नामे विशाल मारूती गवळी, वय ३८, रा.एच.पी. गॅस गोडाऊन समोर, कैलास नगर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करुन आपआपसात वाद झाल्याचा राग मनात धरून, भगव्या रंगाचे रुमालाने (गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावनी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर , गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगीरी केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुयंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व नाशिक जिल्हयातील खेडोपाडयांमधून चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीचे भावात विकी करण्यासाठी काही संशयीत मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव, ता. मालेगाव परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
४) नदिम अहमद नासीर अहमद, रा. करीम नगर, मालेगाव (फरार)
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या होण्डा युनिकॉर्न मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उड़वा उडवीची उत्तरे दिली, त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल पवारवाडी, मालेगाव परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव, सटाणा, कळवण, तसेच नाशिक शहर व जिल्यातील खेडोपाड्यांमधुन एकुण ११ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस ठाणेकडील गुरनं १५८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उपडकीस आलेला आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपीचे कब्जातुन चोरीच्या ०३ हिरो स्प्लेंडर, ०२ होण्डा युनिकॉर्न, ०१ हिरो एचएफ डिलक्स, ०१ यामाहा आरएक्स १००, ०१ होण्डा शाईन, ०१ सुझुकी अॅक्सेस ०१ पेंशन प्रो., ०१ हिरो ड्युएट अशा एकूण चोरीच्या ११ मोटर सायकल किं. रु. ०४ लाख ६० हजार वा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मोटर सायकल चोरीचे गुन्हयांमधील अभिलेखावरील आरोपीतांचे सध्याचे ठाव ठिकाणांबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सुचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वरीलप्रमाणे सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाय सानप, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दिपक गुंजाळ, विनोद टिळे, विशाल गोसावी, नवनाथ शिरोळे, किरण बैरागी, कैलास मानकर, दत्तात्रय माळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत बा करून कामगिरी केली आहे.
नाशिक: प्नतिनीधी संतोष रायचंदे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बापाटील यांनी अशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करणयात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजावी विक्री करणारे इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे.
दिनांक २५/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदिप खैरनार, वय २२, रा. उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक यास ताब्यात घेवून त्यातून किं. ४,७२,२००/- या २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असून त्याचे विरूद्ध पिंपळगाव पोलीस ठाणेस एन.डी.पी.एल. कायदा कलम ८ (क), २०(ब) ||(ब) प्रमाणे गुन्हा करण्यात आला अहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदिप नागपुरे,सतिष जगताप, किशोर खराटे, सतिष घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चापोहवा संतोष पाटील, तानाजी झुरडे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे.
नाशिक: प्नतिनीधी संतोष रियचंदे नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी तकारदार श्री. सुरज भाउसाहेब काळे, रा. टाकाळी विदुर, लासलगाव, ता. निफाड, जिल्हा नाशिक यांना आरोपीनी संपर्क करून Fedx Branch जिल्हा अंधेरी येथुन बोलत आहे, असे सांगुन तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असुन त्या मध्ये बेकायदेशीर सामान पाठविण्यात आले असुन त्यात ०४ ईराणी पासपोर्ट व ड्रग्स आणले आहे असे सांगुन तक्रारदार यांना स्काईप या ऑप्लीकेशनव्दारे रेटटमेंट व व्हेरीफिकेशन साठी पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल केला व Digital Arrest ची धमकी देवुन तकारदार यांचे बँक खात्याची गोपनीय माहीती प्राप्त करून त्यांचे बँक खात्यावरून १० लाख रूपये पर्सनल लोन मंजुर करून ते पुढे आरोपीतांनी RTGS व्दारे त्यांचे बँक खात्यात वळवुन तक्रारदार यांची फसवणुक केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. नागेश मोहिते व मपोहवा १५८७ सुवर्णा आहिरे यांनी वरील तक्रारीची तात्काळ दखल घेवुन बँकेला पत्रव्यवहार करून सदरचे खाते गोठविण्यात आले व त्यावर शिल्लक असलेली ३,२२,०००/- हआर रक्कम तकारदार यांना मा. व्यायालयाचे आदेशाने परत मिळवुन देण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन:- याव्दारे नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बैंक खात्याविषयी माहिती करीता संबंधीत बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी, तसेब फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास त्यावर क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे. किंवा मनीलॉड्रीग असे आहे. अशा बाबत कोषताही फोन आल्यास विश्वास ठेवु नये Digital Arrest बाबत Cyber Police Station किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच आपली गोपनीय माहीती (बँक खाते नंबर, ओटीपी) देवु नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, अथवा सायबर हेल्पलाईन कमांक १९३० किंवा १९४५ तसेच सायबर काईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तकार नोंदवावी.
नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन कमांक फोन नं.०२५३-२२००५०८
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले : राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे आळवे, यवलुज बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून भोगावती नदीवरील हळदी राशिवडे, शिरगाव, कोगे दुधगंगा नदीवरील दत्तवाड यासह जिल्ह्यातील २५ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण ७३ टक्के भरले, विसर्ग सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण असलेलं या धरणातून विसर्ग भोगावती नदीपात्रात केला जात आहे. यामुळं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळं आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी २९ फूट ११ इंच इतकी नोंदली गेली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.
पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रकपालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळाप महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. 6 जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होऊ लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून ला असून 5 जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर 5 ते 9 जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.
पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे .पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्था वैद्यकीय सेवा पाणीपुरवठा स्वच्छता ग्रह हे अग्निशामन व्यवस्था आधी सुविधांचे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. पालखीचा मुक्काम कुठे कुठे असणार? पुण्यात दोन दिवस पालखी मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेला प्रस्थान ठेवणार आहे. 24 तारखेला पुन्हा सासवड होऊन जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल. 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरास्नान होईल. 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभे रिंगण होईल. 1 जुलै नातेपुते येथील पुरंदवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल. 2 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल, तीन जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल, 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावाची विहीर याठिकाणी होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल . संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 21/06/2025 पुणे मुक्काम 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी 23/06/2025 सासवड मुक्काम 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी माऊलींना निरास्मान 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी बरड येथे गोल रिंगण 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी सदाशिवनगर येथे गोल रिंगण 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी खुडूस येथे गोळ रिंगण 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम वाखरी येथे गोल रिंगण 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
कोल्हापूर: Crime News : मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते येथे असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून, विजेचा शॉक देऊन हा खून करण्यात आला आहे. फैजान नजिम (वय ११, रा. बिहार) असे अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बाल निरीक्षणगृहात त्याची रवानगी केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासमोर बोलता झाला आणि त्याने सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी खून केल्याच कबुली दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच या घटनेचा खोलवर तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संशयिताने खून करण्यासाठी वायर कोठून आणली आणि कोठे लपवले आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम तसेच त्यांच्या बाल हक्कांवर आलेले बंधन यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.अशा घटना मदरशांमध्ये वारंवार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांची चौकशी करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
कोल्हापूर: पेठवडगाव वडगाव हातकणंगले रोडवरती हॉटेल कोल्हापुरी कट्टा समोर रस्त्यावर अवजड ट्रक बंद पडल्याने. सोमवारी16 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 7 चे सुमारास अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पेठ वडगाव हे आसपासच्या 40 खेड्यांना जोडणारे शहर असल्यामुळे जर सोमवारी येथे आठवडा बाजार भरत असतो त्यामुळे सोमवारी बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांचे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पेठवडगाव येथे बाजारा निमित्ताने येणे जाणे राहते त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते या रस्त्यावरती हा अवजड मालवाहतूक ट्रक बंद पडल्या मुळे नागरिकांना व वाहन चालक यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे
कोल्हापूर : पेठवडगाव हातकणंगले रोडवरील हॉटेल कोल्हापुरी कट्टा समोर रोडवरती ट्रक बंद पडल्याने सोमवार 16 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 7 अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पेठवडगाव हे आसपासच्या 40 खेड्यांना जोडणारे शहर असल्यामुळे दर सोमवारी आठवडी बाजार भरत असतो सोमवार बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांचे मोठ्या प्रमाणावर पेठ वडगाव येथे बाजीरा निमित्त बाजारपेठेमध्ये येणे जाणे होत असते त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते रोडवरती मध्येच आडवा ट्रक बंद पडल्यावर मुळे नागरिकांना व वहाण चालकांना त्रास सहन करावा लागला.
नाशिक: प्रतिनिधी, संतोष रायचंदे मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायीक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला, (धंदा ॲल्युमिनियम व्यापार) हे व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ०८ लाख रूपये रोख असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत दि. ११/०६/२०२५ रोजी मनमाड पोलीस स्टेशन येथे गुरनं ३५९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर धाडसी घरफोडीचे घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलीसांना सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुवना दिल्या होत्या. सदर घटना घडल्यानंतर मनमाड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देवुन पाहणी केली. त्याचप्रमाणे श्वानपथक ,फिंगरप्रिंट तज्ञ तसेच फॉरेन्सिक टिमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व मनमाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. विजय करे यांनी यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोर पणे अभ्यास करून पडताळणी केली असता सदरचा गुन्हा हा मनमाड शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावून तपासाची चक्रे फिरविली. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातुन खालील सराईत गुन्हेगारांना शिताफिने ताब्यात घेतले. १) संजय किशोर गायकवाड, वय ३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक
२)राकेश अशोक संसारे, वय ३०, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक
३) राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, वय ३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारूती मंदिराचे पाठीमागे, नाशिक मुळ रा. सुलतानपुर चौक, संजुनगर, गोरखपुर, उत्तरप्रदेश यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपीतांना तपासाचे कौशल्य वापरून सदर गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील एक बंद घराचे खिडकीचे गज कापुन व वाकवून त्याव्दारे आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी क्र. १ ते ३ यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून तपासात त्यांचे कब्जातून १०५५.८५० ग्रॅम (०१ किलो ५५८५० ग्रॅग.) वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू. १,०५,४०,०००/- (१ कोटी ५ लाख ४० हजार रू.) चा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेव यातील आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली आहे. तसेव सदर गुन्हयातील उर्वरित मुद्देमालाबाबत यातील आरोपीतांकडे कसोशिने तपास करण्यात येत आहे. यातील ताब्यात घेतलेले तीन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. यातील ताब्यात घेतलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल
अ.क. आरोपी
१ राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या, रा. मदिना चौक, बाशिक, गुळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश
२ संजय किशोर गायकवाड, रा. सनगाह पोलीस ठाणे भहकाली, गंगापुर, इंदिरानगर, उपनगर, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोत, आडगाव, मनमाड, वांदवड, जिल्हा पेठ (जळगाव), जळमाद तालुका, वाळूज एम. आय.डी.सी. (छ.संभाजीनगर)
मनमाड पो. स्टे आर.पी.एफ.मनमाड
घरफोडी-२१
दरोडा तयारी-०१
चोरी-०४
जबरी चोरी-०१
एकूण २७ गुन्हे
चोरी-०२
दुखापत-०१
मुंबई पो. ॲक्ट १४२-०१
मुंबई पो. ॲक्ट १२२-०१ एकुन ०८ गुन्हे
३ राकेश अशोक संसारे, रा. मनमाड मनमाड पो.स्टे. आर.पी.एफ. मनमाड गंभीर दुखापत-०१ बोरी-०१ दंगा-०१ रेल्वे ऑक्ट ३७-०१ एकून- ०४ गुन्हे
यातील आरोपी राजेश रामशंकर शर्मा याचेवर यापूर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीन, जगात छत्रपती संभाजीनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असून तो प्रत्येकवेळी गुन्हा करतांना वेगवेगळे गुन्हेगारांना सोबत घेवून गुन्हे करत असतो, त्याचा राहण्याचा ठावठिकाणा हा, रो नेहमी बदलत असतो. अलीकडील कालावधीतच तो छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जामीनावर मुक्त झाला होता, तेव्हापासून त्याने मनमाड येथील त्याचे वरील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला आहे. यातील आरोपीलांकडून घरफोडी बोरचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्हयाया पुढील तपास मनमाड शहर पोलीस वाणेकशातील अधिकारी व अंमलदार करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे त्यानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, मनमाड पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. विजय करे, सपोनि भरत जाधव, तसेच स्थागुशावे सपोनि किशोर जोशी, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रविण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिला काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांचे पथकाने वरील घरफोडीचा क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.