कोल्हापूर – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने ३ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. या वेळी इस्कॉनसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणार्या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली.
या वेळी ह.भ.प. महादेव यादव महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘इस्कॉन’चे श्री. राहुल देशपांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. अभिजित पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, डॉ. अश्विनी माळकर, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. विकास जाधव, ‘इस्कॉन’चे प्रमुख श्री. दीपक खोत, श्री. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, ‘स्वयंसिद्धा’च्या सौ. स्मिता डोंगरकर,हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख सौ. शीलाताई माने यांसह अन्य उपस्थित होते.
उपस्थित संघटना आणि पक्ष – शिवसेना, इस्कॉन, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, मराठा तितुका मेळवावा, महाराजा प्रतिष्ठान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप
इत्यादी उपस्थित होते यावेळी सर्वानुमते भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी – १५० हून अधिक हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी केली असलेली माहिती
श्री. आनंदराव पवळ शिवानंद स्वामी
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’यांनी दिली
Uncategorized
चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती
Previous Article4k Porn Ultra Hd Top Quality Porn Videos