ॲड. मैलारीराज कावळे यांच्या भूकंप काळरात्र कवितेचा सन्मान
लातूर 🙁 विशेष प्रतिनिधी ) ॲड. मैंलारीराज धोंडीबा कावळे हे मूळचे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या ग्रामीण भागातील रहिवासी असून, त्यांनी 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये त्यांच्या जीवनामध्ये वास्तव काळोख्याची रात्र पसरली, या दुःखमय प्रसंगातूनच कवितेचा जन्म झाला. या कवितेची निवड समितीने निवड करून सादरीकरणासाठी अनुमती दिली. या कवितेला नावही तसेच देण्यात आले होते. ही कविता सादरीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयातील विधीज्ञ मान्यवरानी संधी उपलब्ध करून दिली. “काळरात्र” ही कविता उपस्थित सर्व विधीज्ञ मान्यवर श्रोत्यांना भावली. म्हणूनच या उत्कृष्ट “काळरात्र कवितेला मान आणि सन्मान मिळाला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. मनीष चितळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री. प्रसन्न भालचंद्र वराळे साहेब यांनी कवी ॲड.श्री.मैलारीराज कावळे यांचा मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल वीरशैव कक्कया समाज, सामाजिक स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य लातूर येथील डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शिरीषकुमार शेरखाने तथा संपादक,अशा विविध संघटनांनी, प्रसार माध्यमे, विविध वृत्तपत्र यांनी दखल घेऊन अभिनंदन केले. यांच्या काळरात्र कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सन्मान छ. संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले विधीज्ञ साहित्य संमेलन भरले होते. या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला.