Uncategorized

७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

७ जुलै रोजी आझाद मैदानात संत कक्कय्या समाजाचे धरणे आंदोलनासाठी लातूर येथे बैठकीचे आयोजन

लातूर:- संत कक्कय्या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, या मागणीसाठी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत कक्कय्या समाजाच्या महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी यापूर्वीही २८ जून २०२४ रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला राज्यभरातील समाजबांधव, भगिनी, संस्था, महासंघ आणि संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात समाजाला महामंडळ देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

कल्याण मंडळाचे पदाधिकारी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहून पाठपुरावा करत आहेत. अधिवेशनानंतर निवडणुका जाहीर झाल्या, मंत्रिमंडळ बदल झाला, परंतु शासन निर्णय मात्र अद्याप पारित झालेला नाही.

मागील महिन्याभरात कल्याण मंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट व त्यांच्या सचिवांशी चर्चा करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरीही शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने, मंडळाच्या वतीने दि. ३ जून रोजी मुंबईत आयोजित सभेत ४० हून अधिक जिल्ह्यांतील सभासदांनी आंदोलनाची गरज व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संत कक्कय्या समाजातील सर्व बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, माननीय यशवंतराव नारायणकर, शिंदे सर, शशिकांत सोनवणे सर, आधी यांच्यावतीने मार्गदर्शन झाले. असे आवाहन वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व वीरशैव कक्कया समाजातील ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, शंकरराव इंगळे, श्रीमंतराव कावळे, आदीसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *